शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या मामा तलावांची परस्पर लावताहेत विल्हेवाट

By admin | Updated: July 12, 2014 23:42 IST

राज्यात गोंदिया जिल्हा मामा तलावांच्या ओळखीने अग्रेसर आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेले मामा तलाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा आहे तर सिंचनासह नागरिकांना पिण्याच्या

आमगाव : राज्यात गोंदिया जिल्हा मामा तलावांच्या ओळखीने अग्रेसर आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेले मामा तलाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा आहे तर सिंचनासह नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय या तलावाच्या माध्यमाने पूर्ण होते. परंतु या तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासनाचे अधिकारीच या तलावांची परस्पर विल्हेवाट लावत असल्याने आता शेतकरी सिंचन तर नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत.
राज्य शासनाने सिंचनासाठी उपयुक्त ठरलेल्या तलावांची दुरुस्ती व देखरेख व्यवस्थितपणे व्हावी यासाठी अनेक उपाययोजना केल्या. तर तलावांच्या माध्यमाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी तर भविष्यात पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाने दुरुस्ती व खोलीकरणासाठी उपलब्ध करून दिला.
जिल्ह्यात शासनाच्या मनरेगा अंतर्गत तलावांच्या खोलीकरणाची कामे करण्यात आली. परंतु अनेक ठिकाणी अनधिकृतपणे काही व्यक्ती विशेषांनी तलावांच्या खासगी अतिक्रमणामुळे या तलावांची दुरुस्ती व खोलीकरणाचे कार्य प्रशासनाला करता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणारे पाणी मिळाले नाही.
तर या तलावाच्या सिंचन सुविधेअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित व्हावे लागले.
तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मत्स्य तलावांची संख्या १२६ आहे. यात शहरातच सहा तलाव आहेत. परंतु अनधिकृतपणे या तलावांवर अतिक्रमण असल्याने सिंचनाची सोय उपलब्ध करता आली नाही.
येथील गट क्रमांक ११० व १४२ यात असलेल्या तलावांची शासनाच्या अधिकाऱ्यांनीच परस्पर विल्हेवाट लावली. त्यामुळे या तलाव परिसरात अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. यासंबंधी शासनाकडे ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार केली आहे. परंतु राजकीय दडपणाखाली अतिक्रमणाला वाव मिळात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. तर या तलावांच्या अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या स्त्रोतांमध्ये होणारी वाढही थांबली आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईला नागरिक समोर होत आहेत.
राज्य शासनाच्या सिंचन सुविधेकरिता असलेल्या तलावांवर होत असलेल्या अनधिकृत अतिक्रमणाला आळा घालण्याची आवश्यकता आहे. (शहर प्रतिनिधी)