शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

कोमेजल्या २८१ कळ्या

By admin | Updated: February 4, 2016 01:46 IST

जिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही.

नरेश रहिले गोंदियाजिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही. कुपोषणाबरोबरच इतर कारणांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात गेल्या नऊ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ६६६ महिलांची प्रसूती झाली. यातील १३ हजार ६२६ महिलांची म्हणजेच ९९.७१ टक्के प्रसूती आरोग्य संस्थेतच करण्यात आली, तर फक्त ४० महिलांची प्रसुती घरी झाली आहे. एकूण प्रसूतींपैकी ३ हजार ९२७ उपकेंद्रात, २ हजार २६२ प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ६ हजार ६६२ प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आल्या आहेत. ७७५ प्रसुती खासगी रूग्णालयात करण्यात आल्या. जिल्ह्यातील महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने महिलांना आरोग्य संस्थेतच प्रसूती करावी असा आग्रह धरला. त्याचा परिणाम आज गोंदियासारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होतात. महिलांची आरोग्य संस्थेतच सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने आग्रह धरला होता. यासाठी जनजागृतीही करण्यात आली. त्यामुळे महिलांची घरी प्रसुती होण्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आरोग्य संस्थेत दाखल होऊनही बालमृत्यू थांबविण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे.२.२३ टक्के नवजात बालकांचा मृत्यूमागील नऊ महिन्यात ३०५ म्हणजेच २.२३ टक्के अर्भक दगावले आहेत. यात २४६ महिलांनी जुळ्या बालकांना जन्म दिला. डिसेंबर महिन्यात १ हजार ६६९ प्रसूती झाल्या. यातील १ हजार ६६६ प्रसूती आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आल्या. यात उपकेंद्र ४९०, प्राथमिक आरोग्य केंद्र २६७, बाई गंगाबाई महिला रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात ७५७ व खासगी रूग्णालयात १५७ खासगी रूग्णालयात प्रसूती करण्यात आली. ३ महिलांची प्रसूती घरी झाली. या महिन्यात ४१ नवजात बाळांचा जन्म झाला तर ११ जुळ््या बालकांनी जन्म घेतला.आठवडाभरात ३३.८० टक्के बालकांचा मृत्यू जिल्ह्यात ९ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला. यात १ ते ७ दिवसाच्या आत ९५ बालकांचा मृत्यू झाला आहे. १ ते ६ वर्षातील ३६ बालकांचा तर ६४ बालकांचा जन्म घेतल्यानंतर २४ तासाच्या आत मृत्यू झाला. ७ ते २८ दिवसात ४१, एक महिना ते १ वर्षातील ४५ बालकांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात एक वर्षाच्या आत २७ बालकांचा मृत्यू झाला.रस्त्यातच तीन गर्भवतींचा मृत्यूआरोग्य विभागाने गर्भवतींना आरोग्य संस्थेत पाहेचविण्यासाठी जननी शिशु सुरक्षा योजना अंमलात आणली असली तरी गर्भवतींना योग्य वेळी आरोग्य संस्थेत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाची ही सेवा निष्फळ ठरत आहे. परिणामी नऊ महिन्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. नऊ महिन्यात सहा मातांचा मृत्यू झाला आहे. या मृत गर्भवतींमध्ये ग्रामीण भागातील पाच तर शहरातील एका गर्भवतीचा समावेश आहे. एप्रिल, मे, जून व आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी तर आॅक्टोबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. दोन मातामृत्यू बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात तर एक मातामृत्यू खासगी रूग्णालयात आहे.