शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक न्यायमंचचा ‘एलआयसी’ला दणका

By admin | Updated: November 26, 2014 23:07 IST

आर्थिक अडचणींमुळे शेवटचा विमा हप्ता न भरता पॉलिसी सरेंडर करणाऱ्या विमा ग्राहकाला भारतीय जीवन विमा निगमने (एलआयसी) त्यांची विम्याची रक्कम दिली नाही.

गोंदिया : आर्थिक अडचणींमुळे शेवटचा विमा हप्ता न भरता पॉलिसी सरेंडर करणाऱ्या विमा ग्राहकाला भारतीय जीवन विमा निगमने (एलआयसी) त्यांची विम्याची रक्कम दिली नाही. सदर ग्राहकाला ग्राहक न्यायमंचाने न्याय देत त्यांचे विमा दाव्याचे ६३ हजार ९४५ रूपये दरसाल दरशेकडा १२ टक्के व्याजाने द्यावे, असा आदेश एलआयसीला दिला आहे.
आमगाव तालुक्याच्या बनगाव साई कॉलनीतील रहिवासी लिखनदास हगरू बन्सोड असे विमाधारकाचे नाव आहे. त्यांनी २८ मार्च २००५ रोजी जीवन विमा पॉलिसी काढली होती. या पॉलिसीचा वार्षिक हप्ता १० हजार रूपये होता. पॉलिसीची मुदत २८ मार्च २०१२ पर्यंत होती. त्यांनी शेवटचा हप्ता २८ मार्च २०११ रोजी भरला. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांना शेवटचा हप्ता न भरता १० मार्च २०१२ रोजी पॉलिसी सरेंडर करावी लागली. त्यामुळे एलआयसीला पॉलिसीच्या अटी-शर्तीनुसार सरेंडर किंमत म्हणजे ७१ हजार ५० रूपयांचे ९० टक्के म्हणजे ६३ हजार ९४५ रूपये व त्यावरील व्याज १३ हजार १४४ रूपये असे एकूण ७७ हजार ८९ रूपये लिखनदास बन्सोड यांना देणे अपेक्षित होते.
त्यासाठी त्यांनी २३ एप्रिल व १८ मे २०१२ रोजी एलआयसीकडे लेखी तक्रारी दिल्या. वारंवार विनंत्या केल्या, परंतु एलआयसीने विम्याचे पैसे दिले नाही. त्यामुळे त्यांनी व्याजासह सरेंडर रक्कम एक लाख १२ हजार ५५५ रूपये, नुकसानभरपाई ५० हजार रूपये व तक्रारीचा खर्च १० हजार रूपये मिळविण्यासाठी न्यायमंचात ३० जानेवारी २०१४ रोजी तक्रार दाखल केली.
यानंतर न्यायमंचाने एलआयसीला नोटीस बजावली. विमा कंपनीने आपला जबाब २४ एप्रिल २०१४ रोजी न्यायमंचात दाखल केला. यात लिखनदास बन्सोड यांनी न्यू जीवन सुरक्षा योजना-१ (टेबल-१४७) सात वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक हप्ता १० हजारनुसार घेतली होती. त्यांना त्यांच्या पॉलिसी संबंधित पेंशन घेण्याच्या योजनेनुसार सहा महिन्याच्या आत कळविणे गरजेचे होते. परंतु त्यांनी न कळविल्याने एलआयसीने त्यांच्या पेंशन पॉलिसीप्रमाणे २८ मार्च २०१२ नंतर सुरू करू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या पहिल्या वर्षाचा हप्ता वजा करून सरेंडर किंमत दिली जावू शकते. परंतु १० मार्च २०१२ रोजी सरेंडर दावा ७७ हजार ८९ रूपयांचा केला, तो दिला जावू शकत नसल्याचे एलआयसीने आपल्या जबाबात सांगितले.
तक्रारकर्त्याने पॉलिसीची प्रत, स्टेटस रिपोर्ट, सरेंडर रक्कम मिळण्यासाठी एलआयसीला केलेले अर्ज आदी कागदपत्रे सादर केले. त्यांचे वकील अ‍ॅड.कांबळे यांनी केलेल्या युक्तिवादात नॅशनल कॅश आॅप्शननुसार ७१ हजार ५० रूपये पॉलिसीच्या अटीनुसार बन्सोड यांना ९० टक्के वजा करून ६३ हजार ९४५ रूपये व त्यावरील व्याजासह ७७ हजार ८९ रूपये देणे बंधनकारक होते. शिवाय त्यांनी सरेंडर रक्कम मिळण्यासाठी एलआयसीकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार केला.
मात्र त्यांच्या मागणीला कोणताही संयुक्तिक उत्तर न दिल्यामुळे त्यांनी विमा दावा व नुकसानभरपाई मिळण्यासाठी न्यायमंचात तक्रार दाखल केली. एलआयसीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी संधी देवूनही ते ग्राहक मंचात युक्तिवादासाठी हजर राहू शकले नाही.
यावर ग्राहक न्यायमंचाने कारणमिमांसा करून बंन्सोड यांची तक्रार अंशत: मान्य केली. तसेच त्यांना जीवन विमा पॉलिसीची सरेंडर रक्कम ६३ हजार ९४५ रूपये दरसाल दरशेकडा १२ टक्के व्याजाने ३० जानेवारी २०१४ पासून रक्कम मिळेपर्यंत द्यावी, तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी २० हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश एलआयसीला दिला. (प्रतिनिधी)