शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST

खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांचे मागील १५ वर्षांपासून अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष व्याप्त ...

खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांचे मागील १५ वर्षांपासून अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष व्याप्त असून, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारपासून बिरसी विमानतळाच्या गेटसमोर १०६ कुटुंबीयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. दरम्यान, या धरणे आंदोलनाला उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी भेट देऊन या महिन्याच्या अखेरपर्यंत अतिक्रमण काढून तीन चार महिन्यांत पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका आंदाेलकांनी घेतली आहे.

बिरसी येथील विमानतळासाठी २००६ मध्ये येथील जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या, तसेच त्यांची घरेसुद्धा अधिग्रहित करण्यात आली. मात्र, त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. चार वर्षांपूर्वी बिरसी विमानतळ प्राधिकरणाने गोंदिया उपविभागीय कार्यालयाकडे प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन करण्यासाठी निधीसुद्धा जमा केला; पण यानंतरही या १०६ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. यासाठी या प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा आंदोलनसुद्धा केले. लोकप्रतिनिधींना पण निवेदन दिले; पण यानंतरही त्यांची समस्या मार्गी लागली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदोलन करण्याचा मार्ग पत्करला आहे. या प्रकल्पग्रस्तांची घरेसुद्धा पूर्णपणे जीर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे; पण याची अद्यापही जाणीव शासन आणि प्रशासनाला झाली नाही. त्यामुळेच त्यांनी आता आंदोलनास सुरुवात केली आहे. जोपर्यंत पुनर्वसनाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा निराय राय, शांती दत, बाळकृष्ण तावाडे, सुरेश तावाडे यांनी दिला आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अनिल खडतकर, नायब तहसीलदार सिंगाडेे, बिरसी विमानतळाचे संचालक विनय तांबरकार, सरपंद इंदू वंजारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.