शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

काळाबाजार थांबविण्यासाठी सज्ज रहावे

By admin | Updated: June 26, 2014 23:23 IST

खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बी-बियाणे व खताचा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी यंत्रणेने कामचुकारपणा दाखवू नये. खत व बियाण्यांच्या काळाबाजारीवर

शिवणकर यांचे निर्देश : कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा
गोंदिया : खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बी-बियाणे व खताचा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी यंत्रणेने कामचुकारपणा दाखवू नये. खत व बियाण्यांच्या काळाबाजारीवर आळा घालण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिले आहे.
खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला घेऊन जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्यस्तरीय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलाविली होती. या बैठकीत कृषी विभागाचा आढावा घेत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. दरम्यान बैठकीत खरीप हंगामासाठी महाबीज व खासगी विक्रेत्यांकडून २३ जूनपर्यंत ३१ हजार ४११ क्विंटल बियाणे विक्री झाले असल्याचे माहिती दिली. सध्या जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा नाही, असेही सांगण्यात आले. ८० टक्के बियाण्यांची विक्री झालेली आहे. त्यातही कसलीही तक्रार आलेली नाही. यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीस आलेले नाही, असाही विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खताच्या बाबतीत आढावा सादर करताना त्यांनी सांगितले की, युरिया खतास ४४ हजार क्विंटलची मंजुरी मिळाली आहे. २३ जूनपर्यंत ९ हजार १०० क्विंटल खताचा पुरवठा जिल्ह्याला झाला आहे. जिल्ह्यात एकूण १४ हजार २४७ क्विंटल खताचा साठा असून, जून अखेरपर्यंत १४ हजार क्विंटल युरिया खताची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी दोन हजार ५०० क्विंटल युरिया खत प्राप्त झाले आहे. १२ हजार क्विंटल युरिया खताची कमतरता भासणार आहे. येत्या दोन दिवसांत ५ हजार २०० क्विंटल युरिया पुन्हा जिल्ह्याला पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आढावा घेत असताना जिल्ह्यात खत व बियाण्यांच्या काळाबाजारावरदेखील चर्चा करण्यात आली. यावेळी अनेकदा शेतकऱ्यांची लूट केली जाते. खत काळ्याबाजारात विक्री केले जाते, अशा तक्रारी प्राप्त होत असतात. त्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन सबंधित विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी विभागाने सज्ज राहावे, असे निर्देशही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवणकर यांनी दिलेत. विभागाने खत व बियाण्यांच्या तक्रारीकडे जातीने लक्ष द्यावे, निष्काळजीपणा निदर्शनास आल्यास सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)