शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

पुनर्वसन पॅकेजला मंजूरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:01 PM

सन २००६ नंतर नशिबाने जिल्ह्यात पूर आला नाही. अन्यथा किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील शेकडो कुटुंब धोक्यात आले असते. मात्र बाघ नदी कधी पुराच्या स्थितीत आल्यास मोठा दुर्घटना घडू शकते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : किन्ही-कासा-कटंगटोलासाठी विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २००६ नंतर नशिबाने जिल्ह्यात पूर आला नाही. अन्यथा किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील शेकडो कुटुंब धोक्यात आले असते. मात्र बाघ नदी कधी पुराच्या स्थितीत आल्यास मोठा दुर्घटना घडू शकते. त्यामुळे किन्ही-कासा व कटंगटोला या गावांच्या पुनर्वसनाला प्राधान्याने मंजूरी द्या अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे केलीे.ग्राम कान्ही-कासा-कटंगटोलाच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या कारवाईच्या माहितीसाठी आमदार अग्रवाल यांनी मंत्रालयात विशेष आढावा बैठक बोलाविली होती. यावेळी त्यांनी ही मागणी लावून धरली. राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव मेघा गाडगीळ, वित्त सचिव बी.के.जैन यांच्यासह संबंधीत अधिकाºयांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाच्या कामातील दिंरगाईवर आमदार अग्रवाल यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पुनर्वसनाच्या कामात चालढकलपणा करणाºयावर कारवाई करुन कामाला गती देण्याची मागणी केली.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, कासा व कटंगटोलासाठी भूसंपादन झाले असून त्याच्या पुनर्वसनाची मंजूरी देण्यासाठी सरकार उशीर का करित आहे. असा सवाल देखील उपस्थित केला. यावर विभागाच्या अधिकाºयांनी किन्हीमधील भूसंपादनाची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून लवकरच तीन्ही गावांच्या पुनर्वसन पॅकेजला मंजूरी करीता शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे सांगीतले. तर मदत व पुनर्वसन सचिव गाडगीळ यांनी, विषयांचे गाभीर्य लक्षात घेत येत्या एक महिन्यात तिन्ही गावांच्या पुनर्वसनाला मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या १५ दिवसांत विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेण्याचे निर्देश विभागातील अधिकाºयांना दिले. आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.