शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन पॅकेजला मंजूरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:01 IST

सन २००६ नंतर नशिबाने जिल्ह्यात पूर आला नाही. अन्यथा किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील शेकडो कुटुंब धोक्यात आले असते. मात्र बाघ नदी कधी पुराच्या स्थितीत आल्यास मोठा दुर्घटना घडू शकते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : किन्ही-कासा-कटंगटोलासाठी विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २००६ नंतर नशिबाने जिल्ह्यात पूर आला नाही. अन्यथा किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील शेकडो कुटुंब धोक्यात आले असते. मात्र बाघ नदी कधी पुराच्या स्थितीत आल्यास मोठा दुर्घटना घडू शकते. त्यामुळे किन्ही-कासा व कटंगटोला या गावांच्या पुनर्वसनाला प्राधान्याने मंजूरी द्या अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे केलीे.ग्राम कान्ही-कासा-कटंगटोलाच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या कारवाईच्या माहितीसाठी आमदार अग्रवाल यांनी मंत्रालयात विशेष आढावा बैठक बोलाविली होती. यावेळी त्यांनी ही मागणी लावून धरली. राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव मेघा गाडगीळ, वित्त सचिव बी.के.जैन यांच्यासह संबंधीत अधिकाºयांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाच्या कामातील दिंरगाईवर आमदार अग्रवाल यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पुनर्वसनाच्या कामात चालढकलपणा करणाºयावर कारवाई करुन कामाला गती देण्याची मागणी केली.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, कासा व कटंगटोलासाठी भूसंपादन झाले असून त्याच्या पुनर्वसनाची मंजूरी देण्यासाठी सरकार उशीर का करित आहे. असा सवाल देखील उपस्थित केला. यावर विभागाच्या अधिकाºयांनी किन्हीमधील भूसंपादनाची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून लवकरच तीन्ही गावांच्या पुनर्वसन पॅकेजला मंजूरी करीता शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे सांगीतले. तर मदत व पुनर्वसन सचिव गाडगीळ यांनी, विषयांचे गाभीर्य लक्षात घेत येत्या एक महिन्यात तिन्ही गावांच्या पुनर्वसनाला मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या १५ दिवसांत विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेण्याचे निर्देश विभागातील अधिकाºयांना दिले. आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.