शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
2
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
3
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
4
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
5
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
8
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
9
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
10
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
11
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
12
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
13
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
14
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
15
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
16
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
17
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
18
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
19
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
20
Anudan Scheme: म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
Daily Top 2Weekly Top 5

बहिष्काराने ‘एपीएमसी’ ठप्प

By admin | Updated: December 23, 2014 23:05 IST

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत घेण्याचा पणन संचालकांचा आदेश सहकारमंत्र्यांनी तूर्त स्थगित केला असला तरी तो आदेश पूर्णपणे रद्द करावा, यासाठी गोंदियातील व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार

अडतीचा मुद्दा ऐरणीवर : दोन दिवसांत थांबले एक कोटीचे व्यवहार
गोंदिया: शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत घेण्याचा पणन संचालकांचा आदेश सहकारमंत्र्यांनी तूर्त स्थगित केला असला तरी तो आदेश पूर्णपणे रद्द करावा, यासाठी गोंदियातील व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदीस नकार दिला. यासाठी व्यापाऱ्यांनी सोमवारी (दि.२२) व मंगळवारी (दि.२३) येथील बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवले. यामुळे दोन दिवसात एक कोटींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेल्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अडते (दलाल) हे महत्वाची भूमिका निभावतात. अडते शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळवून तर देतातच शिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम रोख स्वरूपात देतात. या मोबदल्यात येथे तीन टक्के अडत (दलाली) घेतली जाते. मागील कित्येक वर्षांपासून याच स्वरूपात हे व्यवहार सुरू असून यामुळे शेतकरी, व्यापारी व अडते तिन्ही पक्ष समाधानी होते. मात्र राज्याच्या पणन संचालकांनी शेतकऱ्यांची वर्तमान स्थिती बघता आता अडत शेतकऱ्यांकडून न घेता व्यापाऱ्यांकडून घेण्याचे आदेश २० डिसेंबर रोजी काढले. यावर गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीने २२ डिसेंबर रोजी सर्व संचालकांची बैठक घेऊन याबाबत व्यापाऱ्यांना बोलावून माहिती दिली. मात्र व्यापाऱ्यांनी हा प्रकार आपल्यावरील अन्याय असल्याचे सांगत लगेच व्यवहार बंद पाडले.
दरम्यान पणनमंत्र्यांनी त्या आदेशाला स्थगिती दिली. मात्र आदेशावर स्थगिती न देता तो पूर्णत: रद्द करून बाजार समितीतील व्यवहार पूर्वीप्रमाणेच राहू देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. आपल्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी मंगळवारीही (दि.२३) बाजार समितीत व्यवहार बंदच ठेवले.
यामुळे मात्र शेतकऱ्यांना बाजार समितीतून आल्यापावली परत जावे लागले.
शिवाय व्यापाऱ्यांनी धान खरेदीस नकार दिल्याने शेतकऱ्यांसह शासनाचेही नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीतील आडतिया व्यापारी संघाचे अध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, प्रमोद अग्रवाल, संचालक सुरेश अग्रवाल, निर्मल अग्रवाल, संतोष कायते, नवीन रायली, गिरधारी तांबी, मैनुद्दीन तिगाला आदी अडत्यांनी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)