शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार निर्मूलनासाठी सर्व समाजघटकांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

बालमजुरी ही एक गंभीर समस्या असून तीची पायमुळे ही समाजात खोलवर रु तलेली आहेत. बहुतांश मुले बालमजुरीत गुंतल्याने त्यांचे शिक्षण, आरोग्य, विकास आणि भविष्यातील उदरनिर्वाह यावर गंभीर परिणाम होत आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमजुरी समुळ नष्ट करण्यासाठी व बालमजुरी निर्मुलनासाठी स्वयंसेवी संस्था तसेच सर्व समाज घटकांनी पुढाकार घेवून समन्वयाने काम करावे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार यांनी केले.

ठळक मुद्देमहेंद्र पवार : बालकामगार जनजागृत अभियानाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालमजुरी ही एक गंभीर समस्या असून तीची पायमुळे ही समाजात खोलवर रु तलेली आहेत. बहुतांश मुले बालमजुरीत गुंतल्याने त्यांचे शिक्षण, आरोग्य, विकास आणि भविष्यातील उदरनिर्वाह यावर गंभीर परिणाम होत आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमजुरी समुळ नष्ट करण्यासाठी व बालमजुरी निर्मुलनासाठी स्वयंसेवी संस्था तसेच सर्व समाज घटकांनी पुढाकार घेवून समन्वयाने काम करावे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार यांनी केले.राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर कालावधीत बालकामगार जनजागृती मोहिमेच्या उद्देशातून गुरूवारी (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बालकामगार जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे, नमाद महाविद्यालयाचे प्राध्यापक रु तु तुरकर, सामाजिक कार्यकर्ता डॉ.सविता बेदरकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून पंधरे यांनी, संपूर्ण अभियानाची उपस्थितांना माहिती दिली. तसेच प्रकल्पांतर्गत बालकामगार मुलांना कोणत्या सोयी-सुविधा तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्र म व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची माहिती दिली. तसेच बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरीता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत मांडले. तुरकर यांनी, लहान मुलांना कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. ही बाब सर्वांच्या लक्षात येणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ.बेदरकर यांनी, बालकामगार विषयावरती व बालकामगार प्रथा दूर करण्याकरीता प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून कार्य करावे असे सांगितले.संचालन प्रकल्प संचालक महेंद्र रंगारी यांनी केले. आभार कार्यक्र म व्यवस्थापक नितीन डबरे यांनी मानले. कार्यक्र माला शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, नगरपरिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा महिला बाल विकास तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच सहायक कामगार आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक