शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

४० टक्के कुटूंब आजही गवताच्या छताखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:00 AM

महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्याने या परिसराला व्यापले आहे. मधात ६-७ किमी चा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते.

ठळक मुद्देघरकुल योजनेचा पत्ताच नाही : सर्वांना घराचे केवळ स्वप्नच, मुरकुडोह दंडारीवासीयांची उपेक्षाच

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना त्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तालुक्यातील मुरकुडोह दंडारी वसाहतीला भेट दिल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता फारच दूर असल्याचे दिसून येते. येथील चाळीस टक्के कुटुंब अद्यापही गवताच्या छताखाली वास्तव्य करीत आहे. त्यांच्या स्वप्नातील पक्क्या घराचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न कायम आहे.महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्याने या परिसराला व्यापले आहे. मधात ६-७ किमी चा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते. काही स्थानिक लोकांच्या सांंगण्यावरुन वन संपत्ती गोळा करण्यासाठी वन वन भटकणारा आदिवासी समाजाचा घनदाट जंगलात व नदी खोºयात टोळीचा वावर असायचा. कदाचित वन उपज गोळा करुन आपल्या मुलभूत गरज भागविण्यासाठी आदिवासी लोकांची टोळी या भागात गेली असावी.हा भूभाग इतर लोकवस्तीपासून दूर असल्याने त्यांना सूर्यास्तपूर्वी परत जाणे शक्य न झाल्यामुळे त्या लोकांच्या टोळी येथील मोकळ्या भूभागावर आपला डेरा स्थापन केला असावा कालांतराने येथे त्या टोळीचे कुटूंब बिस्तारले आणि वस्ती निर्माण झाली. आधी काळापासून ज्या मूलभूत गरजासाठी लोकांना वन वन भटकावे लागत होते. आजही येथील लोकांचे जीवन या गरजा पूर्ण करण्यापूर्वीच अडकले आहे असे दिसून आले. येथील पाचही गावांमध्ये एकही पक्के घर दिसून आले नाही. येथील बहुतेक घरे मातीची व कौलारु छताचे आहेत. त्यातच ४० टक्के घरे फक्त बांबू आणि गवताच्या छताचे तसेच बांबूच्या भिंती असलेले दिसून येतात.या गावामध्ये अनेक कुटुंबाना साधे कौलारु घरे सुध्दा नशीबी नाही तर मग पक्के घर केव्हा हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.मागील ३०-४० वर्षापासून केंद्र शासनाची आवास योजना सुरू असून सुध्दा एवढ्या वर्षात येथील एकाही कुटूंबाला घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. दर घरकुल योजना या गावापर्यंत पोहचलीच नसल्याचे चित्र आहे.मंजूर झाले तरी घरकुल बनले नाहीमुरकुडोह-दंडारी या गावांचा समावेश ग्रामपंचायत दरेकसामध्ये आहे. या ग्रामपंचायतीमध्ये दरेकसा सोडून डहाराटोला, दलदलकुही वंजारी या गावाचा समावेश असून मुरकुडोह, दंडारीचे पाचही गाव वार्ड नं.२ मध्ये येत आहे. या वॉर्डात घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी अनेक वेळा मागणी केली. दरम्यान काही घरकुल शासनाकडून मंजूर झाले परंतु प्रत्यक्षात बनलेच नाही.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना