शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने १७ कोटींचे नुकसान; पुरात वाहून ७ तर वीज पडून ५ जणांचा मृत्यू

By नरेश रहिले | Updated: September 21, 2022 16:05 IST

९ हजार २२५ घरे, गोठ्यांचे नुकसान

गोंदिया : यंदा १ जून ते ३१ ऑगस्ट २०२२ या काळात आलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील १७ कोटी ३६ लाख ७३ हजार २५० रुपयांचे नुकसान केले. यात मनुष्य प्राणहानी, जनावरांचा मृत्यू, गोठे व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने सानुग्रह मदत करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पुरात वाहून ७ जणांचा तर वीज पडून यंदा ५ जणांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील ९७४ कुटुंबे बाधित झाली. मनुष्य हानीकरीता ४८ लाख १७ हजार २०० रुपये, जनावरे हानीकरीता २० लाख २३ हजार २५० रुपये, घर, गोठे यांच्या हानीकरीता १५ कोटी ८६ लाख ३२ हजार ८०० रुपये तर बाधित व्यक्तींकरीता ८२ लाख असे एकूण १७ कोटी ३६ लाख ७३ जार २५० रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पावसामुळे १२ जणांचा मृत्यू

पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहेत. यातील १६ प्रकरणे जिल्हा प्रशासनाने पात्र केली आहेत. यातील १५ जणांना ४४ लाख १७ हजार २०० रूपयाची मदतही देण्यात आली आहे. ७४ जनावरांचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे ७४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात मोठी दुधाळू जनावरे ३१, लहान दुधाळू जनावरे १८, ओढा काम करणारी मोठी जनावरे १४ तर ओढा काम करणारी लहान जनावरे ११ मृत पावली आहेत. यात मृत जनावरांच्या मालकाला सानुग्रह राशी म्हणून २० लाख २३ हजार २५० रुपये देण्यात येणार आहेत.९२२५ घर, गोठ्यांचे नुकसान

गोंदिया जिल्ह्यात पावसाने ११९ घरे जमीनदोस्त झालीत. ७ हजार २८८ घरांची अंशत: पडझड तर बााधीत सलेल्या १८१८ गोठ्यांची पडझड झाली आहे. यांना मदतीपोटी १५ कोटी ८६ लाख ३२ हजार ८०० रुपये सानुग्रह राशी दिली जाणार आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसweatherहवामानDeathमृत्यूgondiya-acगोंदिया