शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार कुटुंबांची होणार पिण्याच्या पाण्याची सोय

By admin | Updated: November 15, 2014 01:49 IST

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेला ४१९ सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ योजनांना मंजूरी मिळाली आहे.

गोंदिया : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेला ४१९ सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ योजनांना मंजूरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील १६ हजार कुटुंबांना या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे विशेष पाठपुरावा केला होता. या योजना नियमित सुरु झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना बारमाही शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असून पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार नाही.ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाद्वारे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम राबवण्यिात येत आहे. या अनुषंगाने अनेक प्रादेशिक नळ योजना सुरु असल्या तरी अनेकदा वीज बिल अथवा भारनियमनामुळे बऱ्याच योजना बंद आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आपेल्या प्रादेशिक नळ योजना ऐन टंचाईच्या काळात छोट्या गावांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचत नाही. यासाठी शासनाने सौरउर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजना राबविणे सुरु केले आहे. सदर योजनेतुन ४० ते ५० कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते व विजेचे भारनियमन अथवा बिलाचा भुर्दंडही नागरिकांवर बसत नाही. ही योजनादेखील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गतच राबविण्यात येते.गोंदिया जिल्ह्यात २०११-१२ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षात एकूण २९५ अशा योजनांचा मंजूरी मिळाली होती. त्यापैकी २५७ योजना पुर्णत्वास आल्या असून ३८ योजना प्रगतिपथावर आहेत. यातुन जवळपास १० हजार कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होत आहे. या योजनेचे पाच वर्षापर्यंतचे व्यवस्थापन संबंधित यंत्रणाच करीत असल्याने नागरिकांमध्येदेखील या योजनेची मागणी होत आहे. या अनुषंगाने आगामी वर्षात जि.प. ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ४१९ नवीन प्रस्ताव मिळाले. जि.प. प्रशासनाने या सर्व प्रस्तावांना शासनाकडे पाठवून मंजूर करुन घेतले आहेत. प्रत्येक योजनेसाठी साडे चार ते पाच लाख रुपयां पर्यंतचा निधी शासनाकडून मिळणार असून या योजना पुर्णत्वास गेल्यास जिल्ह्यातील १६ हजार कुटुंबांना बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे.या अनुषगांने प्रतिनिधीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अंगद सावंत यांना विचारणा केली असता त्यांनी या अनुषंगाने आपण शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याचे सांगितले. यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभल्यानेच ४१९ योजनांना शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. संपुर्ण देशात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत २० हजार योजनांना मंजूरी मिळाली असताना गोंदिया जिल्ह्याला मिळालेल्या मंजूरीचा आकडा निश्चितच जि.प. प्रशासनाच्या कार्यप्रणालीसाठी प्रेरणादायक असल्याचे ते म्हणाले.