शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षांत केल्या १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या

By admin | Updated: December 3, 2014 22:51 IST

कर्ज घेऊन कुटुंब चालविणारे शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरतात, यातूनच कर्जाला कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी मागील १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत.

नरेश रहिले - गोंदिया
कर्ज घेऊन कुटुंब चालविणारे शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरतात, यातूनच कर्जाला कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी मागील १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत.
कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचे सावट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर राहते. यामुळे सतत नापिकी होत असते. महागडी औषधी व बियाणे वापरून येणाऱ्या उत्पन्नातून कुटूंब सावरणे कठिण होत आहे. धानाला भाव शासनाकडून मिळत नाही. निवडणुका पाहून बोनस दिला जातो. निवडणुका संपल्या की शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पाठ फिरविली जाते. मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. कर्जातच जन्मलेल्या शेतकऱ्याला कर्जातच मरावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नसल्यामुळे राबूनही त्याला योग्य मोबदला मिळत नाही. परिणामी प्रत्येक काम त्याला कर्ज घेऊनच करावे लागते. एकदा घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येणे शक्य नाही आणि दुसऱ्या वर्षीही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबतो. परिणामी तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो.
यामुळेच जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत. सन २००२ मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सन २००३ मध्ये एक, सन २००४ मध्ये सहा, सन २००५ मध्ये सहा, सन २००६ मध्ये २२, सन २००७ मध्ये १९, सन २००८ मध्ये १८, सन २००९ मध्ये १२, सन २०१० मध्ये २२, सन २०११ मध्ये १३, सन २०१२ मध्ये १०, सन २०१३ मध्ये सहा तर सन २०१४ मध्ये १४ अशा एकूण १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या १३ वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४४ शेतकऱ्यांना शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जापायी नसल्याचे सांगून त्यांच्या कुटुंबियांना मदतीपासून वंचीत ठेवले. १०५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जापायी असल्याचे सांगीतले. तर एका शेतकऱ्याची आत्महत्या कर्जापायी आहे किंवा नाही याची पडताळणी शासन करीत आहे.
कर्जापायी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत म्हणून शासनातर्फे एक लाख रूपये देण्यात येते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कर्जापायी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना एक लाख रूपयाप्रमाणे एक कोटी पाच लाख रूपये या १३ वर्षात देण्यात आले आहेत.
(तालुका प्रतिनिधी)