शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

काँग्रेसचे दहा आमदार फुटले होते, भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 4:52 PM

विरोधी काँग्रेस पक्षाचे दहा आमदार नुकतेच फुटले होते. दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास सज्ज झाला होता पण भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींनी यास मान्यता दिली नाही.

पणजी - विरोधी काँग्रेस पक्षाचे दहा आमदार नुकतेच फुटले होते. दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास सज्ज झाला होता पण भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींनी यास मान्यता दिली नाही, कारण आम्हाला कोणताच पक्ष आता अस्थिर करायचा नाही, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी केला.सरचिटणीस नरेंद्र सावईकर व सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत तेंडुलकर यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी बरेच कोटी रुपये भाजपने आमदारांना देऊ केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला होता. आमच्याकडे रेकॉर्डीगही आहे, असे चोडणकर म्हणाले होते. त्या पाश्र्वभूमीवर बोलताना तेंडुलकर म्हणाले की चोडणकर हे काहीही आरोप करत आहेत. त्यांनी रेकॉर्डिग असल्यास जाहीर करावे. रेकॉर्डिगमधील आवाज कुणाचा ते तरी कळून येईल. ज्यावेळी सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले तेव्हा देखील पैशांचा व्यवहार झाला नव्हता. मी स्वत: हे सांगू शकतो. आता आम्ही कुणीच भाजप नेते काँग्रेसच्या कुठच्याच आमदाराशी चर्चा देखील केलेली नाही. त्यांना आम्ही आमच्या पक्षातही बोलवलेले नाही. कारण भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे एकूण तेवीस आमदारांचे संख्याबळ आहे आणि तेवढे संख्याबळ स्थिर सरकारसाठी एकदम पुरेसे आहे. 

तेंडुलकर म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांतीलच एक गोष्ट आपण सांगतो. काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास तयार झाला होता. आम्ही व भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही यास मान्यता दिली नाही. चोडणकर यांचे काँग्रेसच्या कुठच्याच आमदारावर नियंत्रण राहिलेले नाही. काँग्रेसचे आमदार सैरभैर आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे, की देशात आणि गोव्यातही पुढील पंचवीस वर्षे भाजपचीच सत्ता राहणार आहे. आम्हाला गोवा सरकार स्थिर ठेवायचे आहे व त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना आम्ही भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. फ्रान्सिस सिल्वेरा किंवा क्लाफास डायस हे जी वक्तव्ये करत आहेत, त्यांना आम्ही रोखू शकत नाही पण आम्ही पक्षात कुणाला घेणार नाही.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस