शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

विरोधकांची रणनीती तयार; विधानसभा अधिवेशनात सात आमदार विविध प्रश्नी उठवणार आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 13:06 IST

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दालनात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी या चारही पक्षांच्या सातही आमदारांची बैठक होऊन यासंबंधी रणनीती ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येत्या मंगळवारी १८ पासून सुरू होणार असलेल्या पावसाळी अधिवेशनात सातही विरोधी आमदार संयुक्तपणे सरकारला घेरणार आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दालनात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी या चारही पक्षांच्या सातही आमदारांची बैठक होऊन यासंबंधी रणनीती ठरली.

सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर कोंडीत पकडण्याची तयारी विरोधी आमदारांनी केली आहे. म्हादई, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, बंद असलेला खाण व्य व्यवसाय, भ्रष्टाचार इव्हेंट मॅनेजमेंटवरील कोट्यवधींची उधळपट्टी, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे राजधानीची झालेली दैना, शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान, संजीवनी सहकारी साखर कारखाना, बेरोजगारी या वर सरकारला धारेवर धरले जाईल.

१८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत हे अधिवेशन प्रत्यक्ष १८ दिवस चालणार आहे. विरोधकांनी लक्ष्यवेधी सूचना, खाजगी ठराव या माध्यमातूनही सरकारला धारेवर धरण्याची योजना आखली आहे.

सरकारकडून सर्वांचीच फसवणूक : सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, या सरकारने सर्वच घटकांची फसवणूक केली आहे. विधानसभेत या प्रश्नावर आम्ही सरकारला धारेवर धरु. व्यापारी, खाण अवलंबित, शिक्षक, महिला स्वयंसेवा गट यांना सरकारने फसवले आहे. विधानसभेत त्यांच्यासाठी भांडणार आणि न्याय मागणार आहोत. विरोधी आमदार संयुक्तपणे काम करतील.

सरकारला उघडे पाडू : युरी आलेमाव

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, या अधिवेशनात वेगवेगळ्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी विरोधी आमदारांनी केली आहे. सरकारी विधेयके नियमानुसार ४८ तास आधी मिळायला हवीत, लक्षवेधी सूचनांची संख्या वाढायला हवी, अतारांकित प्रश्न १५ वरून ४० करायला हवेत, या सर्व मागण्या आम्ही सभापतींसमोर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्या आहेत. सभापतींनी विरोधकांना सभागृहात बोलण्याची संधी द्यायला हवी व तटस्थ भूमिका निभावायला हवी. 

युरी म्हणाले की, राज्यात गुन्हे प्रचंड वाढले आहेत. भ्रष्टाचार फोफावला आहे. प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे सरकार खाणी सुरू करू शकलेले नाही. ८०० कोटी रुपये महसूल खाणींच्या माध्यमातून अपेक्षित धरला होता. परंतु काहीही होऊ शकलेले नाही. पाच महिने सर्व काही ठप्प आहे. स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे पणजी शहर बुडाले. मुख्यमंत्री एक सांगतात, सार्वजनिक बांधकाम मंत्री दुसरे आणि महापौर तिसरेच बोलतात. त्रास मात्र लोकांना होतो.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसvidhan sabhaविधानसभा