शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विरोधकांची रणनीती तयार; विधानसभा अधिवेशनात सात आमदार विविध प्रश्नी उठवणार आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 13:06 IST

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दालनात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी या चारही पक्षांच्या सातही आमदारांची बैठक होऊन यासंबंधी रणनीती ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येत्या मंगळवारी १८ पासून सुरू होणार असलेल्या पावसाळी अधिवेशनात सातही विरोधी आमदार संयुक्तपणे सरकारला घेरणार आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दालनात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी या चारही पक्षांच्या सातही आमदारांची बैठक होऊन यासंबंधी रणनीती ठरली.

सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर कोंडीत पकडण्याची तयारी विरोधी आमदारांनी केली आहे. म्हादई, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, बंद असलेला खाण व्य व्यवसाय, भ्रष्टाचार इव्हेंट मॅनेजमेंटवरील कोट्यवधींची उधळपट्टी, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे राजधानीची झालेली दैना, शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान, संजीवनी सहकारी साखर कारखाना, बेरोजगारी या वर सरकारला धारेवर धरले जाईल.

१८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत हे अधिवेशन प्रत्यक्ष १८ दिवस चालणार आहे. विरोधकांनी लक्ष्यवेधी सूचना, खाजगी ठराव या माध्यमातूनही सरकारला धारेवर धरण्याची योजना आखली आहे.

सरकारकडून सर्वांचीच फसवणूक : सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, या सरकारने सर्वच घटकांची फसवणूक केली आहे. विधानसभेत या प्रश्नावर आम्ही सरकारला धारेवर धरु. व्यापारी, खाण अवलंबित, शिक्षक, महिला स्वयंसेवा गट यांना सरकारने फसवले आहे. विधानसभेत त्यांच्यासाठी भांडणार आणि न्याय मागणार आहोत. विरोधी आमदार संयुक्तपणे काम करतील.

सरकारला उघडे पाडू : युरी आलेमाव

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, या अधिवेशनात वेगवेगळ्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी विरोधी आमदारांनी केली आहे. सरकारी विधेयके नियमानुसार ४८ तास आधी मिळायला हवीत, लक्षवेधी सूचनांची संख्या वाढायला हवी, अतारांकित प्रश्न १५ वरून ४० करायला हवेत, या सर्व मागण्या आम्ही सभापतींसमोर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्या आहेत. सभापतींनी विरोधकांना सभागृहात बोलण्याची संधी द्यायला हवी व तटस्थ भूमिका निभावायला हवी. 

युरी म्हणाले की, राज्यात गुन्हे प्रचंड वाढले आहेत. भ्रष्टाचार फोफावला आहे. प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे सरकार खाणी सुरू करू शकलेले नाही. ८०० कोटी रुपये महसूल खाणींच्या माध्यमातून अपेक्षित धरला होता. परंतु काहीही होऊ शकलेले नाही. पाच महिने सर्व काही ठप्प आहे. स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे पणजी शहर बुडाले. मुख्यमंत्री एक सांगतात, सार्वजनिक बांधकाम मंत्री दुसरे आणि महापौर तिसरेच बोलतात. त्रास मात्र लोकांना होतो.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसvidhan sabhaविधानसभा