शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची रणनीती तयार; विधानसभा अधिवेशनात सात आमदार विविध प्रश्नी उठवणार आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 13:06 IST

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दालनात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी या चारही पक्षांच्या सातही आमदारांची बैठक होऊन यासंबंधी रणनीती ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येत्या मंगळवारी १८ पासून सुरू होणार असलेल्या पावसाळी अधिवेशनात सातही विरोधी आमदार संयुक्तपणे सरकारला घेरणार आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दालनात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी या चारही पक्षांच्या सातही आमदारांची बैठक होऊन यासंबंधी रणनीती ठरली.

सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर कोंडीत पकडण्याची तयारी विरोधी आमदारांनी केली आहे. म्हादई, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, बंद असलेला खाण व्य व्यवसाय, भ्रष्टाचार इव्हेंट मॅनेजमेंटवरील कोट्यवधींची उधळपट्टी, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे राजधानीची झालेली दैना, शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान, संजीवनी सहकारी साखर कारखाना, बेरोजगारी या वर सरकारला धारेवर धरले जाईल.

१८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत हे अधिवेशन प्रत्यक्ष १८ दिवस चालणार आहे. विरोधकांनी लक्ष्यवेधी सूचना, खाजगी ठराव या माध्यमातूनही सरकारला धारेवर धरण्याची योजना आखली आहे.

सरकारकडून सर्वांचीच फसवणूक : सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, या सरकारने सर्वच घटकांची फसवणूक केली आहे. विधानसभेत या प्रश्नावर आम्ही सरकारला धारेवर धरु. व्यापारी, खाण अवलंबित, शिक्षक, महिला स्वयंसेवा गट यांना सरकारने फसवले आहे. विधानसभेत त्यांच्यासाठी भांडणार आणि न्याय मागणार आहोत. विरोधी आमदार संयुक्तपणे काम करतील.

सरकारला उघडे पाडू : युरी आलेमाव

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, या अधिवेशनात वेगवेगळ्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी विरोधी आमदारांनी केली आहे. सरकारी विधेयके नियमानुसार ४८ तास आधी मिळायला हवीत, लक्षवेधी सूचनांची संख्या वाढायला हवी, अतारांकित प्रश्न १५ वरून ४० करायला हवेत, या सर्व मागण्या आम्ही सभापतींसमोर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्या आहेत. सभापतींनी विरोधकांना सभागृहात बोलण्याची संधी द्यायला हवी व तटस्थ भूमिका निभावायला हवी. 

युरी म्हणाले की, राज्यात गुन्हे प्रचंड वाढले आहेत. भ्रष्टाचार फोफावला आहे. प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे सरकार खाणी सुरू करू शकलेले नाही. ८०० कोटी रुपये महसूल खाणींच्या माध्यमातून अपेक्षित धरला होता. परंतु काहीही होऊ शकलेले नाही. पाच महिने सर्व काही ठप्प आहे. स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे पणजी शहर बुडाले. मुख्यमंत्री एक सांगतात, सार्वजनिक बांधकाम मंत्री दुसरे आणि महापौर तिसरेच बोलतात. त्रास मात्र लोकांना होतो.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसvidhan sabhaविधानसभा