शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लागू झालेले कलम 144 मागे घेऊ-  प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 16:35 IST

कार्निव्हल व शिगमो साजरा करण्यावर कलम 144 चा काहीही परिणाम होणार नाही.

पणजी : राज्यात लागू करण्यात आलेले कलम 144 मागे घेण्याचा सरकारचा विचार आहे. आपण सध्या स्थितीचा आढावा घेत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.

उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दरवेळी कलम 144 लागू करण्याविषयीची अधिसूचना जारी केली जात होती पण त्यामुळे कधीच गोंधळ झाला नव्हता. यावेळी अधिसूचनेला जास्तच प्रसिद्धी मिळाल्याने गोंधळ झाला. काहीजणांचा गैरसमजही झाला. त्यामुळे आपण त्या अधिसूचनेचा फेरआढावा घेईन. आपण दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. कलम 144 मागे घेण्याचाही मी विचार करीन, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कार्निव्हल व शिगमो साजरा करण्यावर कलम 144 चा काहीही परिणाम होणार नाही. दहशतवादी हल्ल्याची शक्यताच नाही. नियमितपणो प्रशासकीय प्रक्रीयेचा एक भाग म्हणून दोन्ही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्याचे काम दरवेळी केले गेले. यावेळीच त्यावरून गैरसमज निर्माण झाल्याने ते कलम मागे घेण्यासाठीही सरकार पाऊले उचलील, असे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटकांनी घाबरू नये. पर्यटन व्यवसायाचा व कलम 144 चा काही संबंध नाही असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्यात येत्या 22 मार्च रोजी जिल्हा पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदारसंघांचे आरक्षणही सरकारने अजून लागू केलेले नाही. यामुळे विरोधी काँग्रेस व मगो पक्षाने सरकारवर टीका केली आहे. निवडणुकाच पुढे ढकला अशीही मागणी विरोधक करू लागले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू होईल असे पत्रकारांनी विचारले असता, एकदा निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम जाहीर होताच, त्याचक्षणी आचारसंहिताही लागू होईल एवढेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा