शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत विरोधकांना संधी न देण्याचा डाव, खंवटे यांच्याकडून सरकार लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 20:53 IST

विधानसभेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी आमदारांना लोकांचे प्रश्न विचारण्याची संधीच मिळणार नाही अशा पद्धतीने सरकारने रणनीती केली आहे.

पणजी : विधानसभेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी आमदारांना लोकांचे प्रश्न विचारण्याची संधीच मिळणार नाही अशा पद्धतीने सरकारने रणनीती केली आहे. आमदार उपस्थित नसताना लॉट्स काढले गेले, जेणोकरून जे आमदार प्रभावी पद्धतीने प्रश्न विचारतात, त्यांना विधानसभेत प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा वेळच मिळणार नाही. विरोधकांचा आवाज बंद करण्याच्यादृष्टीने पुरेशी काळजी सरकारी यंत्रणोकडून घेतली गेली, अशी टीका अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी शुक्रवारी येथे केली.


खंवटे यांनी पत्रकार परिषद घेतली. येत्या दि. 3 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्या अधिवेशनासाठी आम्ही जे प्रश्न पाठविले होते, ते प्रश्न पहिल्या चार दिवसांत येणारच नाहीत अशी व्यवस्था सरकारने केली आहे. पाचव्या दिवशी शुक्रवारी म्हणजे अधिवेशनाच्या अंतिम दिवशी आमचे एक-दोन प्रश्न घेतले गेले आहेत. हे सरकार लोकशाही मानत नाही. सरकारकडे पैसेच नसल्याने बांधकाम खाते व जलसंसाधन खात्याचे कंत्रटदार नवी कामेच हाती घेत नाहीत. त्यांची बिलेच सरकारने फेडलेली नाहीत. राज्य नेतृत्वहीन बनल्याने प्रशासन ठप्प झाले आहे, असे खंवटे म्हणाले. सरकारकडे उत्तरेच नसल्याने आमचे प्रश्नच विधानसभेत येऊ नयेत असे सरकारला वाटते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या अधिवेशनात कृती अहवाल सादर करावा, अशी मागणी खंवटे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी किती आश्वासने दिली, किती घोषणा केल्या व त्याच्या पूर्ततेसाठी कोणती कृती केली ते मुख्यमंत्र्यांनी अहवालातून स्पष्ट करावे. माजी मुख्यमंत्री र्पीकर यांनी कृती अहवाल विधानसभेत सादर करण्याची पद्धत सुरू केली होती, असेही खंवटे म्हणाले.


..तर 5 फेब्रुवारीनंतर रस्त्यावर उतरू 
पर्वरीला चांगले सायन्स व कम्युनिटी पार्क साकारले आहे. त्यावर आता फक्त साठ लाख रुपये सरकारने खर्च केले तर काम पूर्ण होईल व उद्घानटही करता येईल पण सरकार मुद्दाम खर्च करत नाही. साठ लाख रुपये देखील सरकारकडे नाहीत. आपण आणखी काही दिवस थांबेन, अन्यथा पार्कचे काम पूर्ण करण्यासाठी देणगी द्यावी असा बोर्ड आपण पार्काकडे लावीन. येत्या मार्चर्पयत आम्ही पर्वरीवासिय त्याचे उद्घाटन करूच, असे खंवटे यांनी सांगितले. तिसरा मांडवी पुल उभा झाला. मात्र र्पीकर यांच्या निधनानंतर पर्वरीच्याबाजूने रस्त्याचे, गटाराचे वगैरे जे शिल्लक काम करायला हवे होते ते सरकारने केलेच नाही. कंत्रटदार एल अॅण्ड टी कंपनीलाही सरकार देणो आहे. त्यामुळे त्या कंपनीचे तसेच जीएसआयडीसीचे अधिकारीही साईटवर सापडत नाहीत. काम अर्धवट ठेवल्याने पर्वरीच्या बाजूला अपघात होतात. पर्वरी पोलिस स्थानकाकडे यापूर्वी प्रचंड पाणी साठले होते. तिथे पाणी नीट वाहू शकत नाही. येत्या दि. 5 फेब्रुवारीर्पयत सरकारने तिथे काम सुरू केले नाही तर आम्ही पर्वरीवासिय रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :goaगोवा