शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST

पणजी : आंदोलक उपोषणकर्त्यांनी मनुष्यबळ विकास महामंडळातर्फेच अर्ज करून नोकऱ्या मिळवाव्यात. सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही,

पणजी : आंदोलक उपोषणकर्त्यांनी मनुष्यबळ विकास महामंडळातर्फेच अर्ज करून नोकऱ्या मिळवाव्यात. सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. आंदोलकांशी बोलण्याचा पर्याय सरकारने खुला ठेवलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात कोणाचेही हित नसल्याचे ते म्हणाले. उपोषणकर्ते सुरक्षा रक्षक हे खरे तर एप्लायमेंट रिक्रुटमेंट सोसायटीचे कर्मचारी आहेत त्यामुळे सरकार दखल घेणार नव्हते; परंतु कायदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने सरकारला हस्तक्षेप करावा लागत आहे. उपोषणकर्त्यांमध्ये सोसायटीचे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कर्मचारीही आहेत त्यांचा मुळीच विचार केला जाणार नाही. ज्यांनी सोसायटी अंतर्गत सेवा बजावली आहे, त्या सर्वांना महामंडळामार्फत टप्प्याटप्प्याने सेवेत घेतले जाईल. शैक्षणिक पात्रता, वयाची अट शिथिल सर्वांना संधी मिळावी म्हणून शैक्षणिक पात्रता इयत्ता आठवीऐवजी शिथिल करून इयत्ता सहावी करण्यात आली आहे. तसेच ३0 वर्षे वयाची अटही शिथिल करून ४0 वर्षे करण्यात आली आहे. असे असूनही आंदोलकांपैकी कोणी बाहेर उरत असेल तर शैक्षणिक पात्रता तसेच वय आणखीही शिथिल करण्याची सरकारची तयारी आहे. महामंडळातर्फे ५00 सुरक्षा रक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द झालेली आहे. याआधी सोसायटीतील २७१ जणांना सेवेत घेऊन तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. गरीबांबद्दल सरकार संवेदनशील आहे. गोमेकॉत सुरक्षेचे कं त्राट जी फोर कंपनीकडे होते तेव्हा ९५ टक्के सुरक्षा रक्षक परप्रांतीय होते. भाजप सरकार सत्तेवर येताच हे कंत्राट रद्द करून सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना संधी दिली. त्यांना नोकरीची सुरक्षा मिळावी यासाठीच महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ६५ मलेरिया कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले याचा उल्लेखही त्यांनी केला. दरम्यान, भाजपचे महामंत्री सतीश धोंड यांनी उपोषणकर्त्यांना दिलेल्या कथित धमकीबद्दल विचारले असता तसे काही घडल्याचा त्यांनी इन्कार केला. तक्रार द्यायला दुसरा दिवस का उजाडावा लागला, असा उलट सवाल पार्सेकर यांनी केला. (प्रतिनिधी)