शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामकच्या जवानांनी वर्षभरात वाचविली ६३ कोटींची संपत्ती; १६५ नागरिकांचे प्राण वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:41 IST

राष्ट्रीय अग्निशामक सेवा सप्ताह आजपासून

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ६३ कोटी ५२ लाख ४१ हजार ९८२ रुपयांची संपत्ती वाचविण्यात यश मिळविले आहे. विविध आग व आपत्कालीन घटनांमुळे १८ कोटी १६ लाख ५७ हजार १२६ रुपयांचे नुकसान झाले असले, तरीही तत्पर सेवेमुळे मोठे नुकसान टळले आहे.

राष्ट्रीय अग्निशामक सेवा सप्ताहानिमित्त राज्यात आज, १४ एप्रिलपासून विविध जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. या निमित्त नागरिकांमध्ये अग्नी सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. गेल्या काही वर्षात संचालनालयाने आधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेवेत सुधारणा केली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्षभरात अनेक जीव वाचवून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. आग, पाण्यात बुडणे, विहिरीत पडणे अशा विविध घटनांमध्ये तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांनी १६५ नागरिकांचे प्राण वाचविले. याशिवाय ८७४ प्राण्यांचेही प्राण वाचविण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षभरात एकूण ७हजार ९४५ आपत्कालीन कॉल्स प्राप्त झाले. यापैकी २ हजार ८७५ घटना आगीसंदर्भातील तर ५ हजार ७९ इतर आपत्कालीन स्वरूपाच्या होत्या. घरांवर झाडे कोसळणे, वीज खांब पडणे, वाहनांवर झाडे कोसळणे तसेच पाण्यात पडण्याच्या घटनांमध्येही अग्निशमन दलाने तत्परतेने मदत केली.

जनजागृतीवर भर

राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त नागरिकांना अग्नी सुरक्षा नियमांची माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे येथे प्रात्यक्षिके, मार्गदर्शन सत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. घरगुती तसेच व्यावसायिक ठिकाणी आग लागल्यास कसे वागावे, प्राथमिक उपाययोजना कोणत्या कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

नियम कडक; तपासणीत वाढ

अलीकडील आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अग्नी सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विशेषतः हॉटेल, क्लब, व्यापारी आस्थापने यांची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून, काही आस्थापनांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार संचालनालयाने व्यक्त केला आहे.

२९ जणांचा मृत्यू

गेल्या वर्षभरात २९ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची नोंद आहे. विशेषतः पणजीतील रोमियो लेन परिसरातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने अग्नी सुरक्षा नियम अधिक कडक केले आहेत. विविध आस्थापनांची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी परवाने रद्द करण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संचालनालयाने कठोर पावले उचलली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Firefighters saved ₹63 crore property, rescued 165 lives in year.

Web Summary : Goa's fire department saved ₹63 crore in property and rescued 165 people. Despite ₹18 crore in losses, quick response minimized damage. Awareness programs are planned, and safety rule enforcement is strengthened after 29 fire deaths.
टॅग्स :goaगोवाFire Brigadeअग्निशमन दल