शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

वीज खात्याची भरती चर्चेत

By admin | Updated: June 27, 2014 01:35 IST

पणजी : वीज खात्याने वीजपुरवठ्यात सुधारणांच्या नावाखाली निवडणूक आचारसंहितेच्या काळात केलेली १ हजार १५९ पदांची भरती हा सध्या प्रशासकीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.

पणजी : वीज खात्याने वीजपुरवठ्यात सुधारणांच्या नावाखाली निवडणूक आचारसंहितेच्या काळात केलेली १ हजार १५९ पदांची भरती हा सध्या प्रशासकीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे. काही आरटीआय कार्यकर्त्यांचेही लक्ष या घाऊक नोकर भरतीने वेधले आहे. काहीजण अनुभवाचे बोगस दाखले देऊन शासकीय सेवेत घुसल्याचा दाट संशय आहे. वीज खात्यात अनेक वर्षे शेकडो लाईन हेल्पर कंत्राट पद्धतीवर काम करत होते. त्या सर्वांना सेवेत कायम करण्याऐवजी काहीजणांना बाजूला ठेवण्यासाठी शासकीय पातळीवरून विविध क्लृप्त्या लढविण्यात आल्या. १९ सप्टेंबर २०१० रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयात २४ जानेवारी २०१३ रोजी मंत्रिमंडळ बैठक घेऊन बदल केला. त्यामुळे कंत्राट पद्धतीवरील काही लाईन हेल्पर आपोआप कायम सेवेत येण्यापासून बाद झाले. त्यांच्या रिक्त जागांवर काही विशिष्ट मतदारसंघातील व्यक्ती लाईन हेल्पर म्हणून आल्या. त्यांनी अनुभवाचे जे दाखले आणले, त्या दाखल्यांची प्रत आरटीआय कार्यकर्त्यांनी वीज खात्याकडे मागितली असता, ती दिली जात नाही. यामुळे संशय आहे. लाईन हेल्पर भरतीची पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हा ८५९ हेल्पर्स कंत्राट पद्धतीवर सेवेत होते. सप्टेंबर २०१० च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार हे सगळे कायम सेवेत येण्यास पात्र होते. जानेवारी २०१३ रोजी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्र्णयामुळे सुमारे ५१० हेल्पर कायम नोकरीच्या कक्षेत येण्यास पात्र ठरले. दुसरी जाहिरात ३ एप्रिल १३ रोजी प्रसिद्ध झाली. त्यात दोन वर्षांच्या कामाच्या अनुभवाची अट लागू केली गेली. वीज खांबावर चढता यावे अशीही अट होती. एकूण ११५९ पदांसाठी प्रत्यक्षात ११६२ नियुक्ती आदेश जारी केले. त्यानंतर तीन आदेश बाद ठरविले गेले. ही सगळी प्रक्रिया निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पार पाडली. (खास प्रतिनिधी)