लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्यावतीने मंगळवारी काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या महिलाविरोधी भूमिकेचा निषेध करत 'महिला जन आक्रोश पदयात्रा' काढण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या महिलाविरोधी धोरणांचा आणि मानसिकतेचा तीव्र निषेध करण्यासाठी राज्यातील नारीशक्ती एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी हातांत फलक घेऊन विरोधी पक्षांच्या धोरणांचा निषेध केला.
पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या 'नारीशक्ती वंदन अधिनियमा'ला विरोध करणाऱ्या आणि महिलांच्या हक्काच्या प्रतिनिधित्वात सातत्याने अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधी पक्षांच्या भूमिकेचा जोरदार समाचार घेण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महिलांनी अत्यंत जिद्दीने आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
काँग्रेसने 'नारीशक्ती'चा विश्वासघात केला : दामू नाईक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी 'नारीशक्ती वंदन' विधेयक आणले. मात्र, काँग्रेसने अनेक दशके हे आरक्षण अडवून ठेवून देशातील महिला शक्तीचा विश्वासघात केला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी केली.
भारताची नारीशक्ती आता अधिक जागरूक झाली असून ती यापुढे कोणताही विलंब, नकार किंवा विश्वासघात सहन करणार नाही. लोकशाही संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याला विरोध करणे म्हणजे देशाच्या विकासाला विरोध करण्यासारखेच आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडीने केवळ घोषणाबाजी करून महिलांची दिशाभूल केली. मात्र आता प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली असताना ते पळवाट काढत आहेत.' - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
Web Summary : BJP Mahila Morcha protested Congress and INDI alliance's anti-women stance with a rally attended by CM Sawant. They criticized opposition to the 'Nari Shakti Vandan Adhiniyam' and hindering women's representation, accusing Congress of betrayal. CM Sawant emphasized women's growing awareness and the need for action.
Web Summary : भाजपा महिला मोर्चा ने कांग्रेस और इंडी गठबंधन के महिला विरोधी रुख का विरोध किया। मुख्यमंत्री सावंत की उपस्थिति में रैली निकाली गई। 'नारी शक्ति वंदन अधिनियम' का विरोध करने और महिलाओं के प्रतिनिधित्व में बाधा डालने के लिए विपक्ष की आलोचना की गई। कांग्रेस पर विश्वासघात का आरोप लगाया गया। मुख्यमंत्री सावंत ने महिलाओं की बढ़ती जागरूकता पर जोर दिया।