शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून पोहोचावे लागते बिनागुंडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:54 IST

भामरागड तालुका स्थळापासून ३६ किमी अंतरावर असलेल्या बिनागुंडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. नाल्यांवर पूल नाही.

ठळक मुद्देनाल्यावर पूल नाही : आरोग्य कर्मचाºयांचीही कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुका स्थळापासून ३६ किमी अंतरावर असलेल्या बिनागुंडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे नाल्यातील पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. विकासापासून कोसोदूर असलेल्या बिनागुंडासह परिसरात रस्ते व पूल निर्मितीकडेही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.बिनागुंडा हे गाव अतिशय दुर्गम भागात वसले आहे. बिनागुंडाच्या सभोवताल पहाडी आहेत. बिनागुंडा हे गाव लाहेरीपासून १८ किमी अंतरावर आहे. लाहेरीपासून बिनागुंडाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो. वाटेत पाच नाले पडतात. यापैकी एकाही नाल्यावर पूल नाही. लाहेरीपासून सात किमी अंतरावर गुडेनूर नाला आहे. सदर नाला अतिशय मोठा आहे. जंगलातून पाणी येत असल्याने सदर नाला जवळपास आठ महिने भरून राहतो. पावसाळ्यात या नाल्याला अनेकदा पूर येते. तर पावसाळ्यानंतरही या नाल्यांमध्ये कंबरेपेक्षा अधिक पाणी राहते. या नाल्याच्या पाण्यातून पुढे जाताना जीव दावणीलाच लावावा लागतो. मात्र सदर नाला ओलांडल्याशिवाय पर्याय नाही. सदर नाल्यापासून ११ किमी अंतरावर डोंगर आहे. तीन ते चार तास पहाडी चढून बिनागुंडाला जावे लागते. एकदा बिनागुंडाला गेल्यानंतर पावसाळ्यामध्ये तेथून परत येणे शक्य होत नाही. बिनागुंडा ते लाहेरीपर्यंत पायवाट असल्याने १८ किमी अंतर पायदळच तुडवावे लागते. बिनागुंडा परिसरात कुनाकोडी, फोदेवाडा, पुंगासूर, धामनमरका, पेरमिली, भट्टी आदी गावे आहेत. या सर्व गावातील शेकडो नागरिकांना वर्षभर असाच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शासन या गावांना पक्का रस्ता कधी उपलब्ध करून देणार, असा प्रश्न गावातील नागरिक उपस्थित करीत आहेत.आरोग्य सेवा देताना कसरतबिनागुंडा, फोदेवाडा, कुनाकोडी येथे आरोग्य उपकेंद्र असून या उपकेंद्राच्या माध्यमातून बिनागुंडा परिसरातील गावांना आरोग्य सेवा पुरविली जाते. बिनागुंडा उपकेंद्रात डॉ. मेश्राम व एएनएम अल्का मेश्राम, कुनाकोडी येथे एएनएम एलबी लेखामी आणि फोदेवाडा येथे मंगला कुळमेथे व एमपीडब्ल्यू विश्वनाथ कोडापे हे कर्मचारी कार्यरत आहेत. जंगलानी व्यापलेली गावे असल्याने या ठिकाणी मलेरियाचा प्रकोप अधिक राहते. त्यामुळे हे सर्व कर्मचारी मुख्यालयी राहूनच सेवा देतात. एखादेवेळी गावाकडे जायचे असल्यास किंवा भामरागड येथून औषधी आणायची असल्यास याही आरोग्य कर्मचाºयांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो.