शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘घेऊन जाऽऽऽ गे मारबत’चा आवाज लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:03 IST

वृषभ पूजन म्हणजे, बैल पोळा. बारा महिने पाठीवर आसूड झेलणाºया बैलाला पुजन्याचा दिवस. दुसरा दिवस पोळ्याचा पाडवा.

ठळक मुद्देग्रामीण साज हरविला : आधुनिक युगात सणांचे महत्त्व झाले कमी

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वृषभ पूजन म्हणजे, बैल पोळा. बारा महिने पाठीवर आसूड झेलणाºया बैलाला पुजन्याचा दिवस. दुसरा दिवस पोळ्याचा पाडवा. हा दिवस ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी अगदी पहाटे ‘ईडा-पिडा-ढेकून-मोंगसा (डास) घेऊन जा गेऽऽऽ मारबत’ अशी हाकारी देण्याची प्रथा होती. यामुळे माणसाच्या जीवनातील दु:ख कमी होण्यास मदत होते, अशी समजूत होती. मात्र आता ही प्रथा काळाच्या ओघात संपत चालली आहे. त्यामुळे मारबतीच्या दिवशी पहाटेला ऐकू येणारी ‘ईडा-पिडा-ढेकून-मोंगसा (डास) घेऊन जा गेऽऽऽ मारबत’ ही गुंज लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे.द्वापार युगात भगवान कृष्णाला मारण्यासाठी पुतना राक्षसीने मायावी रूप धारण केले व मथूरेत प्रवेश केला. बाल कृष्णाला स्तनपानातून विष पाजण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने तिचा डाव ओळखून राक्षसीनचा वध केला. तिचा अगडबंब देह धारातिर्थी पडला होता. नंदलाल राजाच्या महलातून पुतना राक्षसीनचा अगडबंब मृतदेह बाहेर काढता येत नसल्याने तिचे हातपाय तोडून गावाच्या सीमेवर नेऊन पुरण्यात आले. तेव्हापासून ग्रामीण भागात मारबतीच्या दिवशी पहाटे हातपाय नसलेली बाहुली व पहिल्या दिवशीच्या पाऊणचारातील वडा-पुरी नेऊन गावाच्या सीमेवर ठेवण्याची प्रथा आहे.ग्रामीण भागातील ९५ टक्के नागरिक शेती व्यवसाय करतात. वर्षभर बैल शेतात राबत असल्याने पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. पोळा सणाच्या दिवशी बैलाचे पूजन करून त्याचे उपकार फेडण्याचा प्रयत्न शेतकºयांकडून केला जातो. मात्र काळाच्या ओघात शेतीची साधने बदलत चालली आहेत. बैलांची जागा ट्रॅक्टर घेत आहे. अनेक शेतकºयांनी शेतीला तिलांजली दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बैल पोळ्याचाही उत्साह कमी झाला आहे. मारबतीच्याही अनेक प्रथा बंद पडत चालल्या असल्याचे दिसून येत आहे.मिरवणुकीही संपल्याझाडीपट्टीतील काही गावांमध्ये काळी व पिवळी मारबतीच्या मिरवणुका काढल्या जात होत्या. मात्र काळाच्या ओघात या मिरवणुकाही आता काढणे बंद झाले आहे. विदर्भात नागपूर येथील काळी-पिवळी मारबतीची मिरवणूक आजही प्रसिध्द आहे.मारबतीचा दिवसही पोळ्याच्या सणाप्रमाणेच महत्त्वाचा आहे. मात्र आता संकल्पना बदलत चालली आहे. मारबतीच्या दिवशी दारू ढोसून मांसाहाराचे सेवन करणे, दिवसभर पत्ते, झेंडीमुंडी यासारखे पैशाचे खेळ खेळण्यावर भर दिसतो.