शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
5
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
6
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
7
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
9
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
10
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
11
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
12
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
13
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
14
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
15
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
16
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
19
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
20
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानावर किडीचे संकट

By admin | Updated: May 10, 2015 01:21 IST

देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा तालुक्यात सुमारे सहा हजार हेक्टरवर उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे.

आरमोरी : देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा तालुक्यात सुमारे सहा हजार हेक्टरवर उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक ऐन कापणीसाठी तयार होत असताना धानपिकावर कडाकडपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह या धरणाचे पाणी आरमोरी, देसाईगंज व कुरखेडा तालुक्याच्या काही गावांना पुरविले जाते. सदर धरण मोठे असल्याने खरीप हंगामासोबतच उन्हाळी धानपिकासाठीही पाणी दिले जाते. त्यामुळे या तीन तालुक्यांमध्ये दरवर्षीच मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रावर अधिक धानाची लागवड करण्यात आली.
दरवर्षी पेक्षा यावर्षी उन्हाचा तडाखा कमी असल्याने धानपीक जोमात आले होते. त्यामुळे यावर्षी चांगले पीक येईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत होता. मात्र अचानक या धानपिकावर कडाकडपा रोगाने आक्रमण केले आहे. या रोगाने आरमोरी तालुक्यातील शिवनी भागातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीक धोक्यात आले आहे. या रोगामुळे धानपीक करपल्यासारखे दिसून येत आहे. धानपीक करपल्याने त्याला लागलेले लोंबही भरत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे.
रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली. मात्र रोग आटोक्यात न येता हळूहळू त्याचा विस्तार व प्रभाव वाढतच चालला आहे. कीटकनाशकांच्या फवारणीवर शेतकऱ्यांचे हजारो रूपये खर्च झाले आहेत. ऐन कापणीसाठी धान तयार होत असताना कडाकडपा रोगाने आक्रमण केल्याने हातात आलेले धानपीक करपतेवेळी शेतकऱ्यांना बघावे लागत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात केवळ या तिनच तालुक्यांमध्ये उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले जाते. हे धान विकून शेतकरी खरीप हंगामाच्या खर्चाची तजविज करतात. मात्र हजारो रूपये खर्च करूनही धानपीक हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)

कृषी विभागाचे दुर्लक्ष
शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यासाठी गावपातळीवर कृषिसेवक नेमण्यात आले आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव होऊनही एकही कृषिसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग कृषिकेंद्र मालकाला विचारून त्याच्या मार्गदर्शनानुसार फवारणी करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत रोग आटोक्यात आला नाही. अशा संकटाच्या वेळी कृषिसेवक मार्गदर्शन करीत नसतील तर त्यांचा शेतकऱ्यांसाठी काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून कृषिसेवकांना प्रत्यक्ष बांधावर पाठवून मार्गदर्शन करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.