शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील विद्यार्थिनींना मिळते निकृष्ट जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 01:18 IST

तालुक्यातील वांगेपल्ली येथे समाज कल्याण विभागामार्फतीने चालविल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतिगृहात अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा आरोप

वांगेपल्लीतील वसतिगृह : विद्यार्थिनींनी केले रस्त्यावर अन्नाचे गंज घेऊन आंदोलन ; कारवाईची मागणी अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली येथे समाज कल्याण विभागामार्फतीने चालविल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतिगृहात अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा आरोप मुलींनी करीत या विरोधात मुलींनी वसतिगृहाबाहेर अन्न भरलेले भांडे आणून आंदोलन केले. मागील आठवड्यात समाज कल्याण विभागाचे निरिक्षक यांनी वसतिगृहाला भेट दिली होती. त्यावेळी मुलींनी जेवनाबाबत त्यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हापासून पुन्हा निकृष्ट दर्जाचे जेवन दिल्या जाऊ लागले. याबाबतची तक्रार वसतिगृह प्रमुखाकडे केली असता, आपण या अगोदर ज्यांना तक्रार केली, त्यांनाच सांगा, असे उत्तर वसतिगृह प्रमुखांनी दिले. त्यामुळे विद्यार्थिनींचा नाईलाज झाला. परिणामी विद्यार्थिनींनी अन्न भरलेले गंज व इतर भांडे अहेरी मार्गावर आणून आंदोलन केले. वसतिगृहात मुलींना पोटभर जेवन दिल्या जात नाही. सर्व मुलींना केवळ दोन पोळ्या व एक प्लेट भात दिल्या जाते. जेवनामध्ये अळ्या राहतात. भाजीत पाणी टाकले जाते. जाड तांदळाचा भात दिला जातो. चिकनमध्ये पाणी जास्त टाकले जाते. केळी व सफरचंद चांगल्या दर्जाचे नसतात. याबाबत वारंवार वसतिगृह अधीक्षकांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही, असे आंदोलनकर्त्या मुलींचे म्हणणे आहे. आंदोलनाची माहिती मिळताच समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त व्ही. एम. मोहतुरे यांनी वसतिगृहाला भेट दिली व मुलींशी चर्चा केली. त्याचबरोबर मोहतुरे यांनी वसतिगृह प्रमुख, पर्यवेक्षक यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुलींनी आंदोलन मागे घेतले. यावेळी मोहतुरे यांच्यासोबत नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, तावाडे, पोलीस उपनिरिक्षक कोडेकर, तांबूसकर, पोलीस हवालदार संतोष मंथनवार, रिजवान आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी आंदोलन करण्यासाठी वसतिगृहाबाहेर जाताना विद्यार्थिनींना वसतिगृहाचे चौकीदार व पर्यवेक्षक यांनी अडविले असता, चौकीदार, पर्यवेक्षक व आंदोलनकर्त्या मुली यांच्यामध्ये ओढाताण झाली. यामध्ये दोन मुली किरकोळ जखमी झाल्या.