शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या साेडवा, अन्यथा आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेरची : शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या ९ फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्यात याव्यात, अन्यथा महाग्रामसभेच्या वतीने १० फेब्रुवारीला काेरची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेरची : शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या ९ फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्यात याव्यात, अन्यथा महाग्रामसभेच्या वतीने १० फेब्रुवारीला काेरची तहसील कार्यालयावर माेर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात काेरचीच्या तहसीलदारांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या नावे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून काेणतीही मदत अजूनपर्यंत मिळाली नाही.

शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्यात यावे. एमपीएससी कायदा लागू करावा, दुष्काळग्रस्त कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी. शेतकऱ्यांचे बँकांकडून घेतलेले पीक कर्ज पुनर्गठन करण्याचे आदेश असताना बँकांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करण्यात यावी. तालुक्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी काढलेल्या प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम तत्काळ जमा करावी. काेरची तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे वीजबिल माफ करावे तसेच प्रलंबित असलेले शेतातील वीज कनेक्शन तातडीने जोडून देण्यात यावे.

तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये व नगरपंचायत क्षेत्रात १०० दिवसांचा राेजगार राेहयाेअंतर्गत देण्यात यावा. तालुका मुख्यालयात भारतीय स्टेट बँकेची नवीन शाखा सुरू करावी, वन हक्क प्राप्त सातबारावर धान्य खरेदी करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या मागण्यांसाठी १० फेब्रुवारीला काेरची येथील गाेटूल भूमीवरून तहसील कार्यालयावर माेर्चा काढण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना झाडूराम हलामी, राजेश नैताम, अशोक गावतुरे, राजाराम नैताम, नरेंद्र सलामे, शीतल नैताम, पवन कोराम, जागेश्वर कोरेटी, रुपेश कुमरे, पंजाबराव उईके, मोहनलाल कुमरे, कुमारीबाई जमकातन, सुलवंती पोरेटी, मंजुबाई घावडे, कलेश्‍वरी काटेंगे, कुमारोबाई गोटा, रामबाई कोडापे, मदनलाल पोरेटी, ईजामसाय काटेंगे आदी उपस्थित हाेते.