शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वीज टॉवरच्या उभारणीसाठी मौल्यवान झाडांची कत्तल

By admin | Updated: October 16, 2016 00:58 IST

चंद्रपूरवरून छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे जाणाऱ्या वीज टॉवर उभारणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व कोरची ..

रेडिएशनचा त्रास वाढणार : शेकडो हेक्टरवरील जंगल धोक्यातकोरची : चंद्रपूरवरून छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे जाणाऱ्या वीज टॉवर उभारणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील मौल्यवान झाडांची कत्तल केली जात आहे. यामध्ये कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी कोरची तालुक्यातून तीन समांतर वीज टॉवर लाईन गेली आहे. त्याच्या बाजुला आणखी एक लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही लाईन जेथून जात आहे, त्या लाईनमधून ५०० ते ७०० मीटर रूंदीच्या पट्ट्यातील झाडांची तोड केली जात आहे. पुन्हा दोन ते तीन लाईन या ठिकाणावरूनच जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून सांगितली जात आहे. सहा ते सात समांतर लाईन गेल्यास दोन किमी रूंदीच्या पट्ट्यातील संपूर्ण झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. यामुळे या परिसरातील ३० टक्के वनसंपदा नष्ट होण्याचा धोका आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे काम जंगल तोडीला परवानगी न मिळाल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. त्याचबरोबर नवीन प्रकल्प, रस्ते, तलाव, विद्युतची कामेसुद्धा रखडली आहेत. मात्र वीज लाईन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी शेकडो किमी अंतरावरील वनसंपदा तोडली जात आहे. याला परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न कोरची तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार दिले असल्याचे सांगितले जात असले तरी एकाही गावाच्या ग्रामसभेची परवानगी घेण्यात आली नाही. अनेक गावांचा या टॉवर लाईनला विरोध असतानाही स्थानिक आदिवासींवर दबाव टाकून काम पुढे रेटले जात आहे. या टॉवर लाईनमुळे हजारो कुटुंब भूमीहीन होण्याची शक्यता आहे. सदर टॉवर लाईनमधून ११ हजार मेगावॅट विद्युत प्रवाह राहणार असून येथील रेडिएशनचा धोका परिसरातील मानव व इतर प्राण्यांनाही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)