शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

याही वेळी उसेंडींना बसणार फटका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:09 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे.

ठळक मुद्देनिष्क्रियता भोवण्याची शक्यता : मतदारांना गृहित धरल्यामुळे वाढली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोमात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही सुरूवात झाली आहे. अशा स्थितीत कोणतीही हयगय झाल्यास उमेदवारांना नुकसान सहन करावे लागू शकते. असे असताना काँग्रेस उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या कार्यपद्धतीने पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्यात टाकले आहे. परंपरागत मतदारांना गृहित धरून त्यांच्या नेत्यांनाही डावलले जात असल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका डॉ.उसेंडी यांना बसेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.गडचिरोली-चिमूर मतदार संघात पाच उमेदवार रिंगणात आहेत. मात्र प्रमुख लढत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांच्यातच आहे. ५ वर्षाच्या आमदारकीनंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत उसेंडी यांना दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या आमदारकीच्या काळात गडचिरोलीला मंजूर झालेले महिला व बाल रुग्णालय, कृषी महाविद्यालय ही त्यांची नाही तर तत्कालीन पालकमंत्री आर.आर. पाटील यांची देण असल्याचे सांगत मतदारांनी त्यांना नाकारले होते. आता पुन्हा ते आपले नशिब आजमावत आहेत. मात्र मतदारांना आपल्या बाजुने करण्यात ते कमी पडत आहेत.सिरोंचा ते सालेकसा अशा ५०० किलोमीटरच्या या मतदार संघात त्या-त्या भागात प्रभाव असणारे काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी योग्य तो समन्वय ठेवणे गरजेचे झाले आहे. मात्र आपल्याला विश्वासातच घेतले जात नाही, असे खासगीत बोलून अनेक पदाधिकारी उसेंडी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढेच नाही तर गठ्ठा मते असणाऱ्या विविध समाजाच्या नेत्यांमध्येही डॉ.उसेंडी यांच्या भूमिकेमुळे नाराजी दिसून येत आहे. त्यांना योग्य तो मान देण्याऐवजी गृहित धरले जात असल्यामुळे हे नेते कामाला लागलेले नाहीत. त्यांची नाराजी उसेंडी यांच्यासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दक्षिण गडचिरोली भागात काँग्रेसची मदार बऱ्याच अंशी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर आहे. ते काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये सक्रिय सहभागही घेत आहेत. पण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचेच नेते प्रचारातून गायब आहेत. आधीच गेल्या पाच वर्षातील जनसंपर्काचा अभाव, त्यात नेत्यांना सोबत घेण्याचे कसब दिसत नसल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे.भाजप आणि काँग्रेसमधील प्रचार पद्धती पाहिल्यास भाजपचा प्रचार नियोजनबद्धरित्या सुरू असल्याचे दिसते, तर काँग्रेसच्या प्रचारात बºयाच अंशी ताळमेळ नाही. कार्यकर्त्यांवर योग्य ते नियंत्रण नसल्यामुळे ते भरकटत आहेत. त्यांना दैनंदिन सोयीसुविधा देतानाही हात आखडता घेतला जात असल्यामुळे कार्यकर्ते मन लावून काम करायला तयार नाहीत.हीच स्थिती राहिल्यास उसेंडी यांना याही वेळी फटका बसल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे.वंचित बहुजन आघाडी बिघडवणार गणितमागासवर्गीय समाजाला भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष नेहमीच जवळचा वाटत आला आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाजाचे आरक्षण घटविण्याचा निर्णय आधी काँग्रेसच्याच काळात झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर ओबीसी समाजाची नाराजी आहे. भाजपच्या काळात हे आरक्षण पुन्हा घटले. ते पूर्ववत वाढविण्याचा प्रयत्न खासदार या नात्याने अशोक नेते यांनी केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. अशा स्थितीत ओबीसी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदार बहुजन आघाडीकडे वळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस