शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकास निधीचे २५६ काेटी रूपये मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक विभागांच्या निधीमध्ये कपात केली. कपात केलेला बहुतांश निधी काेराेनाची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरला जात ...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक विभागांच्या निधीमध्ये कपात केली. कपात केलेला बहुतांश निधी काेराेनाची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरला जात हाेता. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील स्थानिक विकास निधीचा पहिला हप्ता मे महिन्यात उपलब्ध करून दिला. यावेळी ८४ काेटी ६१ लाख २० हजार रूपये एवढा निधी दिला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात १७२ काेटी रूपयांचा निधी दिला आहे. राज्य शासनाने मंजूर केलेला सर्वच निधी गडचिराेली जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. या निधीचे नियाेजन करून ताे वेळेत खर्च करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमाेर आहे. काेराेनाची साथ आता उतरंडीला लागली आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत हाेण्यास सुरुवात झाली आहे. काेराेनाच्या कालावधीत अर्थचक्र ठप्प पडले हाेते. मात्र लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच पुन्हा अर्थचक्र गती पकडण्यास सुरूवात झाली आहे.

बाॅक्स...

ठराविक जिल्ह्यांना निधी

डीपीसीसाठी जेवढा निधी मंजूर केला हाेता. तेवढाही निधी मिळणाऱ्या राज्यातील काही माेजक्या जिल्ह्यांमध्ये गडचिराेली जिल्ह्याचा समावेश आहे. मागील वर्षीचा बहुतांश निधी खर्च झाल्याने यावर्षी राज्य शासनाने पूर्ण निधी गडचिराेली जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे. यावर्षीचाही निधी वेळेत खर्च हाेईल, अशी अपेक्षा आहे.

(कोट)

गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याला विकासात्मक कामांसाठी पूर्ण निधी मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार मागणी केली. पालकमंत्र्यांनीही मनावर घेतले. त्यामुळे निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. कोरोनाकाळामुळे अनेक अडचणींना तोंड देत कामे करावी लागत आहे. तरीही निधी वेळेत खर्च करून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा लागेल.

- धर्मरावबाबा आत्राम

आमदार, अहेरी (राष्ट्रवादी काँग्रेस)

केवळ निधी पूर्ण मिळून काही होणार नाही. आलेल्या निधीचा वापर किती होतो हे पाहणे महत्वाचे आहे. अधिकारी वर्ग कामे करत नाही. तरीही ३१ मार्चला निधी खर्च झाल्याचे दाखविले जाते. प्रत्यक्षात तो निधी खर्चच होत नाही. कामचुकार अधिकाऱ्यांमुळे निधी परत जाण्याची वेळ येते. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहीजे.

- डॉ.देवराव होळी

आमदार, गडचिरोली (भाजप)