शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
4
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
5
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
6
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
7
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
8
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
9
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
10
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
11
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
12
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
13
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
14
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
15
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
16
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
17
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
18
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
19
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
20
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ९९ लाखांतून भूमिगत विद्युतीकरणाच्या कामाला गती

By admin | Updated: November 9, 2015 05:06 IST

शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जुन्या विद्युत खांबामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन किरकोळ

गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या जुन्या विद्युत खांबामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर पालिकेवर सत्ता असलेल्या युवाशक्ती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शासनाकडून नगरोत्थान योजनेतून १ कोटी ९९ लाख रूपयांचा निधी खेचून आणला. या निधीतून चामोर्शी मार्गावर इंदिरा गांधी चौकापासून तर जंगल कामगार सोसायटीपर्यंत भूमिगत विद्युतीकरणाचे काम करण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती गडचिरोली नगर पालिकेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
नगरोत्थान योजनेच्या १ कोटी ९९ लाख रूपयांच्या निधीतून चामोर्शी मार्गावर नवीन वीज खांब बसविण्यात आले. विद्युत जनित्र व रोहित्र बसवून भूमिगत वीज लाईन जोडण्यात आली. या मार्गावरील भूमिगत वीज लाईन सुरू झाली असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. चामोर्शी मार्गावर अडथळा होत असलेले जुने वीज खांब काढण्यात आले. तसेच या मार्गावरील काही जुने वीज खांब काढण्याचे काम शिल्लक असून ते दिवाळीनंतर करण्यात येणार आहे.
माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे यांच्या कार्यकाळात सन २०१३-१४ या वर्षात युवाशक्ती आघाडीने पुढाकार घेऊन चामोर्शी व चंद्रपूर मार्गावरील भूमिगत विद्युतीकरणाचे काम मंजूर केले होते. चामोर्शी मार्गावरील भूमिगत विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर चंद्रपूर मार्गावर इंदिरा गांधी चौकापासून ते कॉम्प्लेक्सपर्यंत भूमिगत विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. राजेश कात्रटवार यांनी दिली. चंद्रपूर मार्गावरील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात धानोरा व आरमोरी मार्गावरही भूमिगत विद्युतीकरणाचे काम घेण्यात येणार आहे. चारही मार्गावरील भूमिगत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या चारही मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन अपघाताला पूर्णत: आळा बसणार आहे, असा आशावाद प्रा. कात्रटवार यांनी व्यक्त केला आहे.
भूमिगत विद्युतीकरणाच्या कामासाठी शासनाकडून निधी खेचून आणण्यात विधान परिषद सदस्य आ. मितेश भांगडिया व चिमूरचे आ. बंटी ऊर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात युवाशक्ती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यश मिळविले आहे, असे प्रा. कात्रटवार यांनी स्पष्ट केले. (स्थानिक प्रतिनिधी)

तीन प्रभागात होणार विकास कामे
४गडचिरोली नगर पालिकेला दलित वस्ती योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावरून प्राप्त झालेल्या पाच कोटी रूपयांच्या निधीतून दलित वस्ती असलेल्या प्रभाग क्र. ४, प्रभाग क्र. ५ व प्रभाग क्र. ६ मध्ये सिमेंट काँक्रिट नाल्या, सिमेंट काँक्रिट रोड व डाबरीकरण रस्ते आदी विकास कामे करण्यात येणार आहे. या कामांची निविदा प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यात पूर्ण होणार असून सदर कामे नोव्हेंबर महिन्यात हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. राजेश कात्रटवार यांनी दिली आहे.

दलित वस्तीचा निधी सव्वा तीन कोटींनी वाढला
४सन २०१३-१४ पर्यंत गडचिरोली पालिकेला राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावरून १ कोटी ८० लाखांचा दलित वस्तीचा निधी मिळाला होता. यापेक्षा अधिक निधी गडचिरोली न. प. ला शासनाकडून कधीही मिळाला नाही. दलित वस्ती निधीतून शहरात अधिकाधिक विकास कामे करण्याचा संकल्प युवाशक्ती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर नगर पालिकेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार यांनी विधान परिषद सदस्य आ. मितेश भांगडिया व चिमूरचे आ. बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात शासनाकडे सातत्याने निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. सन २०१५-१६ या वर्षासाठी नगर पालिकेला दलित वस्ती योजनेतून पाच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तब्बल ३ कोटी २० लाख रूपयांचा दलित वस्ती योजनेचा निधी वाढवून आणण्यात युवाशक्तीच्या नेत्यांना यश आले आहे.