शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

मिरची उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:00 AM

तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडणीसुद्धा मजुरांकडून करण्यात आली आहे. तोडलेल्या मिरचीचे ढीग शेतशिवारात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतात व घरी पडून : कोरोनाच्या संचारबंदीने वाहतूक व विक्री थांबली

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : कोरोनाच्या संचारबंदीने दळणवळण, वाहतूक व बाजारपेठ बंद असल्याने सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. लाखो रूपयांची गुंतवणूक करून पिकविलेली लाल मिरची विक्रीअभावी शेतशिवार तसेच घरी पडून आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडणीसुद्धा मजुरांकडून करण्यात आली आहे. तोडलेल्या मिरचीचे ढीग शेतशिवारात करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी मिरची उन्हात वाळल्यानंतर मिरची घरी असलेल्या ढोलीमध्ये सुरक्षितरित्या ठेवली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शहरातील व्यापाऱ्यांना मिरची विकण्याचा प्रयत्न केला. मात्र मिरचीची विक्री करता आली नाही. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे संकट उद्भवले. संचारबंदी व बाजारपेठ बंदमुळे शेतमालाची वाहतूक थांबली. उत्पादित मिरची विक्रीअभावी पडून असल्याने सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लालरंगाची मिरची पांढरी पडत असून भाव कमी मिळण्याच्या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले आहेत.माल नेण्याची मुभा द्याएक हेक्टर क्षेत्राच्या मिरची पिकासाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन लाख रूपये खर्च येतो. मोठी गुंतवणूक करूनही मिरची बाजारपेठेत पोहोचू न शकल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नागपूरच्या मिरची बाजारात सिरोंचातील मिरची नेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मिरची उत्पादक शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी