शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या दीड हजारांवर विद्यार्थ्यांची काेराेनामुळे परीक्षेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST

गडचिराेली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा एप्रिल ते मे महिन्यांदरम्यान ...

गडचिराेली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा एप्रिल ते मे महिन्यांदरम्यान घेण्यात येणार आहे. मात्र, काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे यावर्षी परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. दीड हजारांवर विद्यार्थ्यांनी यावर्षी बाेर्डाच्या परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

शैक्षणिक जीवनाचा व करिअरचा टर्निंग पाॅइंट समजल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परीक्षा यशस्वी केल्यानंतर पुढील शैक्षणिक वाटचाल व करिअरचा मार्ग सापडत असताे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही या परीक्षांना प्रचंड महत्त्व देतात. इतकेच नव्हे, तर यश व करिअरसाठी झपाटून जाऊन या परीक्षेत भरघाेस यश मिळविण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम करतात.

पहिले शैक्षणिक सत्र संपल्यावर दिवाळीनंतर बाेर्डाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरून नाेंदणी करावी लागते. मात्र, यावर्षी काेराेनामुळे सात ते आठ महिने शाळा बंद राहिली. काेराेना संसर्गाचा प्रसार हाेऊ नये, याकरिता खबरदारी म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाइन शिक्षण पद्धती राबविण्यात आली. स्मार्ट फाेन व व्हाॅटस्ॲपच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. मात्र, ही शिक्षण पद्धती फारसी प्रभावी ठरली नाही. दरम्यान, शासनाच्या वतीने निर्णय झाल्यावर दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यापासून इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविण्यास सुरुवात झाली.

काेराेनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी बाेर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरले नाहीत. विद्यार्थ्यांसह पालकांचे दुर्लक्ष झाले. परिणामी, यावर्षी बाेर्डाची परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

बाॅक्स...

दहावीचे परीक्षार्थी

१५,१०३

२०२०

..............

१३,५८२

२०२१

बारावीचे परीक्षार्थी

१२,२०१

२०२०

...............

१०,६०२

२०२१

बाॅक्स....

पुनर्परीक्षार्थ्यांची संख्या ३७० वर

- इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षेत मागील शैक्षणिक सत्रात नापास झालेल्या मात्र यावर्षी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३७० पेक्षा अधिक आहे. दरवर्षी पुनर्रपरीक्षार्थ्यांची संख्या यापेेक्षाही अधिक असते. मात्र, काेराेना संसर्गामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी बाेर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरले नाही. पुनर्परीक्षार्थ्यांचा ऑनलाइन शिक्षण पद्धतीत सहभाग नव्हता. घरीच अभ्यास करून तयारी करावी लागत हाेती. त्यामुळे यावर्षी पुनर्परीक्षार्थ्यांची संख्या घटली आहे.

- सन २०२० मध्ये गतवर्षी एकूण १५ हजार १०३ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची बाेर्डाची परीक्षा दिली. यावर्षी ही संख्या कमी झाली असून, १३ हजार ५८२ परीक्षार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. गतवर्षी २०२० मध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेला १२ हजार २०१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. यावर्षी काेराेनामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या घटली असून, ती १० हजार ६०२ इतकी आहे.