शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाचपेक्षा अधिक गुन्ह्यांत अडकलेल्यांना तडीपार करू

By admin | Updated: January 29, 2016 04:29 IST

जिल्ह्यात दारूबंदी असताना जे लोक दारूचा व्यवसाय करीत असतील आणि त्यांच्यावर पोलिसात पाच पेक्षा अधिक

वैरागड : जिल्ह्यात दारूबंदी असताना जे लोक दारूचा व्यवसाय करीत असतील आणि त्यांच्यावर पोलिसात पाच पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असेल, अशांना तडीपार करण्याची कारवाई जिल्हा पोलीस प्रशासन करेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे तुकाराम विद्यालयाच्या प्रांगणात महिला व्यसनमुक्ती तथा दारूबंदी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट होते. उद्घाटन प्राचार्य पी. आर. आकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग, शुभदा देशमुख, जि. प. सदस्य सविता वाटगुरे, पं. स. सदस्य कविता दडमल, महादेव नाकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, पोलीस निरिक्षक अनिल पाटील, सरपंच चंद्रकांत चौके, उपसरपंच दमयंती सहारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण आकरे, गजानन कुमरे, फाल्गुण नारनवरे, दत्तात्रय क्षिरसागर, नुसाराम कोटांगले, टिकाराम मांदाळे, भाग्यवान टेकाम उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, दारूचे गुन्हे असणाऱ्या लोकांवर गुन्हा सिद्ध होण्यासाठी विलंब होतो, तेव्हा पोलिसांनी पकडलेली दारू तपासणीसाठी जिल्ह्यात फिरत्या वैज्ञानिक प्रयोग शाळेची सुविधा निर्माण केली जाणार असून गावातील महिला अवैध दारू पकडून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचवतील. त्यांना जाण्या-येण्याच्या खर्चाची तरतूदही केली जाणार आहे. दारू पकडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार दखल घेत नसतील तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कट्रोल रूममवर संपर्क करा, अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कढोली आणि परिसरातील दारूबंदी समितीच्या महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आपल्या समस्या सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत चौके यांनी केले. संचालन प्रा. प्रदीप बोडणे यांनी केले. (वार्ताहर)दारूबंदीसाठी पोलिसांवर निर्भर राहू नका- राणी बंग४या कार्यक्रमात बोलताना डॉ. राणी बंग म्हणाल्या की, समाजात वाईट व्यसनाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास भविष्यात समाजाची विनाशाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे केवळ पोलीस दारूबंदी करतील, यावर निर्भर न राहता, दारूबंदीसाठी महिला व पुरूषांनी पुढे येऊन गावाची वाईट गोष्टींपासून सोडवणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन केले.व्यसनमुक्ती मेळाव्याला मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मंचावर पी. आर. आकरे, डॉ. राणी बंग, जीवन नाट, अभिजीत फस्के.