शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१०० शेतकऱ्यांनी गिरविले सगुणा पध्दत भात लागवडीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:55 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील माविमच्या प्रांगणात सगुणा पध्दतीने भात लागवड बाबत कार्यशाळा घेण्यात आली.

अंमलबजावणी करण्याचे चंद्रशेखर भारसावले यांचे आवाहन : कृषी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी उपस्थितगडचिरोली : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील माविमच्या प्रांगणात सगुणा पध्दतीने भात लागवड बाबत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बचत गटातील १०० पुरूष व महिला शेतकऱ्यांसह कृषी महाविद्यालयाचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सगुणा पध्दतीने भात लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याने या पध्दतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन रायगडचे कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भारसावले यांनी केले. विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे होते. विशेष अतिथी म्हणून रायगडचे अनिल निवलकर, राजेश वाणी तर प्रमुख अतिथी म्हणून माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, अश्विनी जांभुळकर, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भारसावले म्हणाले, आपल्याकडची शेती नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. कमी खर्चाची, कमी श्रमाची, कमी नुकसानीची व जास्त उत्पन्न देणारी शेतीची पध्दती म्हणजेच सगुणा पध्दतीने भात लागवड होय. कार्यक्रमाचे संचालन प्रांजली वसाके यांनी केले तर आभार चारूदत्त वाढई यांनी मानले. सदर कार्यशाळेला निलेश सांगोले, सचिन नरूले, सतीश प्रधान, विक्रम त्रिपदे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)पहिल्या टप्प्यात दोन हजार एकरात एसआरटी पध्दतीने लागवडमाविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, उपजीविका सल्लागार, तालुका व्यवस्थापक, सहयोगिनी व गावातील प्रेरक महिलांनी आत्मा कार्यालयाच्या सहकार्याने रायगड येथे अभ्यासदौरा केला व तेथून सगुणा पध्दतीने भात लागवडीचे तंत्रज्ञान आत्मसात केले. या पध्दतीने भात लागवड करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून तीन वर्षात २०० गावात १० हजार एकर पर्यंत एसआरटी पध्दतीने भात लागवड करण्याचे ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यात या वर्षात दोन हजार एकरपर्यंत सगुणा पध्दतीने भात लागवड करण्याचे ठरविण्यात आले आहे. या बाबत कृषी विज्ञान केंद्रातर्फे मुल्यांकन करण्यात येणार आहे.