शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शतकोटी वृक्ष लागवडीचे आॅडिट रखडले

By admin | Updated: October 14, 2014 23:18 IST

शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी मोहीम एक महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने संपूर्ण प्रशासन निवडणुकीच्या

देसाईगंज : शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी मोहीम एक महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने संपूर्ण प्रशासन निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहे. त्यामुळे शतकोटी वृक्ष लागवडीच्या आॅडिटचे काम रखडले आहे. सदर कामाला आता दिवाळीनंतरच गती येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. संपूर्ण राज्यात १०० कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात शतकोटी वृक्षलागवड योजनेची अंमलबजावणी केली. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषद, महसूल विभाग, वन विभागाला एका विशिष्ट प्रमाणात वृक्षांची लागवड करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च राज्य शासनाकडून संबंधित विभागाला उपलब्ध करून देण्यात आला. त्याचबरोबर वृक्ष लागवडीची सक्तीही करण्यात आली. आपल्यावर कारवाई होऊ नये यासाठी प्रत्येकच विभागाने उद्दीष्टाएवढे किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात वृक्षांची लागवड केली, असे कागदोपत्री दाखविले. मात्र प्रत्यक्षात फारच कमी प्रमाणात वृक्ष जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने शिक्षकांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची तपासणी मोहीम सुरू केली. ज्या शाळांंमध्ये हरितसेना पथक कार्यरत आहे. या पथकाकडून वृक्ष पाहणीचे काम सुरू करण्यात आले होते. शालेय वेळ वगळून हे काम शिक्षकांना करायचे होते. यामध्ये वृक्ष लागवडीची संख्या, वृक्षांची परिस्थिती, झाडांची उंची, झाडाला लावण्यात आलेले कुंपन, लागवड केलेल्या वृक्षांच्या प्रजाती व गावकऱ्यांनी प्रतिक्रिया तपासली जाणार आहे. वृक्ष तपासणी मोहिमेला सुरूवात झाल्यानंतर अगदी आठ दिवसांतच विधानसभेचे आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे निवडणुकीच्या कामामध्ये महसूल प्रशासनासह, शिक्षण, वनीकरण, वन विभागाचे कर्मचारी व्यस्त झाले. त्यामुळे तपासणीचे काम थंडावले असल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे वृक्ष तपासणीचे काम दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतरच सुरू होईल, अशी शक्यता अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. मोहीम रखडल्याने राज्यात नेमकी किती झाडे जिवंत आहेत. याचा अधिकृत आकडा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. (प्रतिनिधी)