शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्राणहिता नदीने गिळली शेकडो हेक्टर शेतजमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

कौसर खान सिराेंचा : सततच्या पुरामुळे गाेदावरी व प्राणहिता नद्यांचे पात्र खचून नदीलगत असलेली अनेक शेतकऱ्यांची शेकडाे हेक्टर सुपीक ...

कौसर खान

सिराेंचा : सततच्या पुरामुळे गाेदावरी व प्राणहिता नद्यांचे पात्र खचून नदीलगत असलेली अनेक शेतकऱ्यांची शेकडाे हेक्टर सुपीक जमीन नदीत विलीन झाली आहे. परिणामी या शेतकऱ्यांवर भूमिहीन हाेण्याची पाळी आली आहे. ही भरून न निघणारी हानी टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सिराेंचा तालुक्याला प्राणहिता व गाेदावरी या दाेन नद्यांचा वेढा आहे. अनेक गावे नदीजवळ वसली आहेत. काही शेतकऱ्यांची शेतजमीन अगदी नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात येत असलेल्या पुरांमुळे नदीचे पात्र खचत जाते. त्यामुळे नदीकाठाजवळची जमीन नदीत लुप्त हाेत चालली आहे. यावर्षी जवळपास ४०० हेक्टर जमीन नदीत लुप्त झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नदीकाठची जमीन सुपीक असल्याने शेतकरी या शेतजमिनीवर प्रामुख्याने मका, ज्वारी, मूग, मिरची आदी पिकांची लागवड करीत हाेते. नदीच्या पाण्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध हाेत हाेती; मात्र या जमिनीवर आता रेतीचा थर जमा झाला आहे. त्यामुळे त्यात काेणतेच उत्पादन घेणे शक्य नाही. शेतीतून निघणारे उत्पादन बंद झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. महसूल विभागाने या जमिनीचा सर्व्हे करून ज्या शेतकऱ्यांची जमीन नदीत गेली आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी हाेत आहे.