शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेला पट्टा दिलेले जंगल अतिक्रमणधारकांकडून भूईसपाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

शासनाने भामरागड ग्रामसभेला २०१४ मध्ये पर्लकोटा नदीच्या बाजूने पश्चिमेकडील ४८३ हेक्टरचा वनहक्क पट्टा दिला. त्यातील वनौपजातून ग्रामसभेला मिळकत येत आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून त्या जागेवर तालुक्यातील लोक अतिक्रमण करत आहेत.  वनविभाग किंवा कोणाकडूनही कारवाई होत नसल्यामुळे जुलै महिन्यात आणखी काही लोकांनी अतिक्रमण करून जेसीबीने झाडे पाडली.

ठळक मुद्देभामरागडमधील शेकडो झाडांची कत्तल, ग्रामसभेच्या तक्रारींकडे प्रशासनाची डोळेझाक

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड ग्रामसभेला पर्लकोटा नदीलगत देण्यात आलेल्या ४८३ हेक्टर सामूहिक वनपट्ट्यावर अनेक लोकांनी अतिक्रमण करून त्यावरील मौल्यवान झाडे भुईसपाट करणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे वनविभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कारवाई न करता डोळेझाकपणा केला जात असल्याचा आरोप भामरागड ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. शासनाने भामरागड ग्रामसभेला २०१४ मध्ये पर्लकोटा नदीच्या बाजूने पश्चिमेकडील ४८३ हेक्टरचा वनहक्क पट्टा दिला. त्यातील वनौपजातून ग्रामसभेला मिळकत येत आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून त्या जागेवर तालुक्यातील लोक अतिक्रमण करत आहेत. वनविभाग किंवा कोणाकडूनही कारवाई होत नसल्यामुळे जुलै महिन्यात आणखी काही लोकांनी अतिक्रमण करून जेसीबीने झाडे पाडली.पत्रकार परिषदेला भामरागड ग्रामसभा आणि वनसमितीचे अध्यक्ष वामन उईके, सचिव भारती इष्टाम, आदिवासी सेवक सबरबेग मोगल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

स्थानिक नागरिक, महिलांना धमकीअतिक्रमण करणाऱ्यांना ग्रामसभेच्या वतीने काही गावकऱ्यांनी टोकले असता त्यांनाच जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. गावातील नागरिकांनी यासंदर्भात तहसीलदार आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली; पण कोणीच त्याकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांना या अधिकाऱ्यांचे तर पाठबळ नाही ना? अशी शंका ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

...तर पट्टा करणार शासन जमा

वन कायद्याचे उल्लंघन करत अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे भामरागडवासीय त्रस्त झाले आहेत. अतिक्रमणधारकांनी हा पट्टा असाच गिळंकृत केल्यास तो ग्रामसभेच्या नावाने असण्यास काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे गावकरी मंडळी हा पट्टा शासनाला परत करून आंदोलनाला सुरुवात करू, अशी भूमिका ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अधिकारी उंटावरून हाकतात शेळ्याग्रामसभेला वनहक्काचा पट्टा दिला असला तरी त्या जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. असे असताना वनविभागाचे अधिकारी तक्रार करूनही कोणतीच कारवाई करायला तयार नाहीत. सर्व अधिकारी आलापल्ली, अहेरीत राहतात. तेथूनच कारभार पाहत असल्यामुळे आता कोणाकडे न्याय मागायचा? असा सवाल भामरागड ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भामरागड परिसरातील आदिवासींच्या अशिक्षीतपणाचा आणि भाेळ्याभाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेत अधिकारीही बनवाबनवी करत आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग