शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांची टीका आशीर्वाद म्हणून घेईल, तुम्ही शेर तर मी तुमची लेक शेरणी !

By संजय तिपाले | Updated: September 12, 2024 16:15 IST

भाग्यश्री आत्राम भावूक : राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश, मोठे शक्तिप्रदर्शन

गडचिरोली :  जनतेचे प्रश्न विचारले तर माझ्यावरच आरोप केले, मला मतदासंघांत फिरवले अन् ऐनवेळी स्वतः लढण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या टीकेने खूप दुःख झाले, पण त्यांची टीका आशीर्वाद म्हणून घेईल... असे भावोद्गार काढून तुम्ही शेर तर मी तुमची लेक शेरणी आहे आणि शेरणी अधिक आक्रमक असते असा इशारा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी दिला. 

राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) शिवस्वराज्य यात्रा १२ सप्टेंबरला अहेरीत दाखल झाली. यावेळी झालेल्या मेळाव्यात भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी पक्ष प्रवेश केला.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार सुनील भुसारा,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी महिला आघाडी विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य ऋतुराज हलगेकर , माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट आदी उपस्थित होते. आई स्व.स्नेहादेवी तसेच वडील व मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना  चरणस्पर्श करते, असा उल्लेख करून भाग्यश्री आत्राम भावूक झाल्या.  हुंदका आवरत त्यांनी कथित बंडावर तपशीलवार खुलासे केले.  

त्या म्हणाल्या, मंत्री साहेबांना फुरसत नाही. आम्ही कार्यकर्ते जोडून ठेवले. लोकांच्या सुख, दुःखात मी गेले. इथल्या बेरोजगार युवकांना रोजगार द्यायचा होता तर सुरजागडमध्ये का दिला नाही असा सवाल त्यांनी केला. वडलापेठमध्ये सुरजागड इस्पात हा नवा प्रकल्प सुरू करत आहेत, पण त्याचे संचालक कोण आहेत, त्यांच्यावर चिटफंड घोटाळ्याचे आरोप आहेत ते संचालक कसे, असा प्रश्नही त्यांनी केला. माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, पण कोणाला हात लावला तर गाठ माझ्याशी, असा इशाराही त्यांनी दिला. मैदान जवळच आहे. मीच चौका मारणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, महेबुब शेख, सुनील गव्हाणे, अतुल गण्यारपवार आदींची भाषणे झाली.

शरद पवारांनी घर फोडले नाही , मीच तीनवेळा भेटलेशरद पवार यांनी घर फोडल्याच्या मंत्री धर्मरावबाबांच्या आरोपाला भाग्यश्री आत्राम यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, त्यांनी घर फोडले नाही, मी स्वतःच त्यांना तीनवेळा भेटले. धर्मरावबाबा आत्राम यांचे १९९० मध्ये  नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. तेंव्हा शरद पवार यांनी प्रयत्न करून सुटका केली होती. हे उपकार कधी विसरता येणार नाहीत.. आता मी त्यांच्या पक्षात काम करून हे ऋण फेडणार आहे , असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPoliticsराजकारण