शेतकऱ्यांनाे, खते, बी-बियाणे खरेदीत सावधानता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:00 AM2021-05-12T05:00:00+5:302021-05-12T05:00:33+5:30

शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीसाठी प्राधान्य द्यावे. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडे पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टण/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे सीलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी. 

Farmers should be careful in purchasing fertilizers and seeds | शेतकऱ्यांनाे, खते, बी-बियाणे खरेदीत सावधानता बाळगा

शेतकऱ्यांनाे, खते, बी-बियाणे खरेदीत सावधानता बाळगा

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन : जिल्ह्यात लगबग वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सध्या धान शेती पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. रोहिणी नक्षत्रावर काही शेतकरी धूळवाफेच्या पेरण्यांना प्रारंभ करीत असतात. त्यासाठी लागणारी खते, बी-बियाणे खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र, खरेदी करीत असताना, शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीसाठी प्राधान्य द्यावे. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडे पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टण/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे सीलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी. 
तसेच कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यांनी तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष/ दूरध्वनी/ ई-मेल/ एसएमएस, आदीद्वारे देऊन शासनाच्या गुणनियंत्रण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषीनिविष्ठांची खरेदी करताना किंमत, मालाबाबत बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

१२ तास सुरू राहतील कृषी केंद्रे
n गडचिराेली जिल्ह्यात काेविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुकानांची वेळ व टाळेबंदीबाबत धाेरण आखण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये माेडत असलेली कृषी केंद्र दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे व त्यांच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्याची अनुमती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहे. 
n बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी साहित्यांचा अडथळ्यांविरहित पुरवठा करणे, कृषी संबंधित कार्य व त्यांच्या संबंधित कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्याबाबत कृषी आयुक्त पुणे यांनी जिल्हा परिषदेला कळविले हाेते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करून कृषी केंद्र सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ ही दिली आहे.

पथकाची नजर राहणार
खते, बि-बियाणे, कीटकनाशके आदीसह विविध कृषी निविष्ठांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक हाेऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत यावर्षी सुद्धा पाच ते सहा भरारी पथक ठेवण्यात येणार आहे. कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले हे पथक जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांच्या कारभारावर व कृषी निविष्ठांच्या मालावर नजर ठेवणार आहेत. गैरप्रकाराला आळा घालणार आहे.

कृषी अवजारे बनविण्यावर भर
ग्रामीण भागातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून कृषी व्यवसायात विविध पिकांच्या शेत लावगडीसाठी लागणारे लाकडी अवजारे बनविण्याच्या कामात लागले आहे. गावातील सुताराकडे जाऊन नांगरण, वखर, कुऱ्हाड, टिकास आदींचे दांडे व इतर वस्तू तयार करून घेताना दिसून येत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेती अवजारांची जुळवाजुळव करीत आहे. 

 

Web Title: Farmers should be careful in purchasing fertilizers and seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.