शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

सद्भावनेमुळेच वाढतेय जिल्हा बँकेची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 6:00 AM

दीप टंडन म्हणाल्या, कमीत कमी चुका करत जास्तीत जास्त जलद सेवा देण्याचे कसब जिल्हा बँकेने साध्य केले आहे. त्यामुळेच ही बँक रिझर्व्ह बँकेकडून आयएफएससी कोड पाटकावणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक ठरली. बँकेची सेवा भविष्यात अधिक ग्राहकोपयोगी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीईओ सतीश आयलवार यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा सांगितला.

ठळक मुद्देप्रंचित पोरेड्डीवार : वर्धापन दिनी ज्येष्ठ खातेदारांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजपर्यंत जिल्ह्यातील साडेचार लाख लोकांना आपल्याशी जोडले. विविध ग्राहकोपयोगी सेवेसोबतच बँकेने खातेदारांबद्दल जपलेली सद्भावना यामुळेच या बँकेची चांगली प्रतिमा तयार झाली असून ही प्रतिमा दिवसेंदिवस आणखी उजळेल, असा विश्वास गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला.बँकेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खातेदारांचा मेळावा व सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला एचएसबीसी बँकेच्या माजी उपाध्यक्ष दीपा टंडन (कोलकाता), बँकेचे संचालक तथा माजी उपाध्यक्ष डॉ.बळवंत लाकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार प्रामुख्याने उपस्थित होते.दीप टंडन म्हणाल्या, कमीत कमी चुका करत जास्तीत जास्त जलद सेवा देण्याचे कसब जिल्हा बँकेने साध्य केले आहे. त्यामुळेच ही बँक रिझर्व्ह बँकेकडून आयएफएससी कोड पाटकावणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक ठरली. बँकेची सेवा भविष्यात अधिक ग्राहकोपयोगी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीईओ सतीश आयलवार यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा सांगितला. काही ज्येष्ठ ग्राहकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सेवानिवृत्त झालेल्या व बँकेचे पगारदार खातेधारक असलेल्या विविध क्षेत्रातील आठ लोकांचा सपत्निक शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात भास्कर रामटेके, नरेशचंद्र कोडापे, श्यामराव अवखरे, कल्पना भोयर, सुधाकर तुमराम, प्रकाश गाठे, रामदास टिकले व कमलाकर बांगरे आदींचा समावेश होता.- तर उलाढाल पोहोचणार ५ हजार कोटींवरयावेळी मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, जिल्हा बँकेने शेतकरी, महिला बचत गटांसह युवकांसाठी मोबाईल बँकिंग, सुवर्णतारण अशा विविध समाज घटकांसाठी सेवा देणे सुरू केले. ग्राहकांच्या विश्वासामुळेच बँकेची प्रगती होत आहे. पण आम्ही अजूनही परिपूर्ण झालो असे समजत नाही. आता ३ हजार कोटींच्या व्यवसायाचा पल्ला गाठत असलेली ही बँक याच गतीने वाटचाल करत राहिल्यास पुढील पाच वर्षात ५ हजार कोटींचा पल्ला गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :bankबँक