शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 663 ठिकाणचे पिण्याचे पाणी देत आहेत आजाराला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

पाण्यामध्ये आर्यन, फ्लाेराईड, क्लाेराईड, नायट्रेट आदी घटक आढळून येतात. हे घटक एका विशिष्ट प्रमाणात असल्यास ते पाणी आराेग्यासाठी याेग्य मानले जाते. मात्र जमिनीतील बदलामुळे कधी-कधी पाण्यात या घटकांचे प्रमाण अतिशय कमी किंवा जास्त हाेण्याची शक्यता असते. असे पाणी आराेग्याला धाेकादायक मानले जाते. 

ठळक मुद्देरासायनिकदृष्ट्या ६०३ तर अनुजैविकदृष्ट्या ७ नमुने ठरले अनफिट

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : एप्रिल ते जून या कालावधीत गावातील जलसुरक्षकामार्फत सार्वजनिक स्रोतांच्या पाण्याचे १० हजार ४८२  नमुने गाेळा करण्यात आले. त्यापैकी ६६३ ठिकाणचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत. या ठिकाणी काेणतीही उपाययाेजना न करता या ठिकाणचे पाणी पिल्यास आराेग्याला धाेकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
पाण्यामध्ये आर्यन, फ्लाेराईड, क्लाेराईड, नायट्रेट आदी घटक आढळून येतात. हे घटक एका विशिष्ट प्रमाणात असल्यास ते पाणी आराेग्यासाठी याेग्य मानले जाते. मात्र जमिनीतील बदलामुळे कधी-कधी पाण्यात या घटकांचे प्रमाण अतिशय कमी किंवा जास्त हाेण्याची शक्यता असते. असे पाणी आराेग्याला धाेकादायक मानले जाते. 
तसेच पाण्यात शेवाळ असल्यास तेही पाणी धाेकादायक मानले जाते. त्यामुळे वर्षातून दाेनवेळा म्हणजेच पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर पाण्याची तपासणी केली जाते. गाेळा केलेले नमुने गडचिराेली, अहेरी, आरमाेरी, चामाेर्शी, कुरखेडा या ठिकाणी असलेल्या शासकीय प्रयाेगशाळांत तपासणीसाठी पाठविले जातात. पाण्याच्या नमुन्यांची रासायनिक व अनुजैविक अशी दाेन प्रकारे तपासणी केली जाते. एखाद्या ठिकाणच्या जलस्रोतामध्ये घटकांचे प्रमाण अधिक असल्यास त्या ठिकाणचे पाणी पिण्यास प्रतिबंध घातले जातात. 
अनुजैविकदृष्ट्या पाणी पिण्यास अयाेग्य असल्यास ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या जातात. 

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या
पिण्याचे पाणी कधी-कधी अनुजैविक घटकांमुळे दूषित हाेते. अशावेळी पाणी उकळून पिणे हा सर्वांत चांगला उपाय आहे. विशेष करून ग्रामीण भागातील विहिरींचे जलस्रोत दूषित हाेतात. त्यामुळे विहिरीतील पाणीसुद्धा दूषित हाेण्याचा धाेका राहतो. पाणी उकळल्यामुळे जीवजंतू नष्ट हाेतात.

पाण्याच्या जलस्रोताच्या सभाेवताल स्वच्छता असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीसह गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. वर्षातून किमान एकदा तरी पाण्याची तपासणी करून घ्यावी. पाणी पिण्या अयाेग्य असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर त्या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी वापरू नये. 
- प्रशांत गाेलांगे, 
सहायक भूवैज्ञानिक, गडचिराेली.

खासगी व्यक्तीही करू शकते तपासणी
जलसुरक्षकामार्फत केवळ सार्वजनिक जलस्रोतांचे नमुने घेतले जातात. एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या घरच्या बाेअरवेल किंवा विहिरीच्या पाण्याची तपासणी करायची असल्यास तसा अर्ज जवळपासच्या प्रयाेगशाळेत करावा लागताे. गडचिराेली, अहेरी, आरमाेरी चामाेर्शी, कुरखेडा या ठिकाणी शासकीय पाणी तपासणी प्रयाेगशाळा उपलब्ध आहेत. पाणी तपासणीसाठी जवळपास ४५० रुपये शुल्क आकारले जाते. 

 

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य