शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

धवलक्रांती ठरले शेतकऱ्यांसाठी स्वप्नच

By admin | Updated: October 16, 2014 23:25 IST

जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी १०० च्यावर दुग्ध विकास सहकारी संस्था स्थापन करून त्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. मात्र सध्य:स्थितीत यापैकी केवळ ७ ते ८ संस्था सुरू आहेत.

गडचिरोली : जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी १०० च्यावर दुग्ध विकास सहकारी संस्था स्थापन करून त्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. मात्र सध्य:स्थितीत यापैकी केवळ ७ ते ८ संस्था सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात धवलक्रांती निर्माण होण्याचे केवळ एक स्वप्नच ठरले असल्याची टीका होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे फार कमी साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक शेतीचाच व्यवसाय करतात. शेती व्यवसायाला दुधाचा चांगला जोड व्यवसाय होऊ शकतो. या उद्देशातून दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दुग्ध विकास सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. या शेतकऱ्यांना अनुदानावर दुधाळ जणावरांचे वाटप करण्यात आले. मात्र पशुसंवर्धन तसेच दुग्ध विकास विभागाने सदर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले नाही. त्यामुळे सदर जनावरे काही दिवसातच मृत्यूमुखी पडले. त्याचबरोबर दुधाचे प्रमाणही कमी झाले. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले दुध जास्त काळ टिकावे यासाठी कनेरी येथे शीतकेंद्र स्थापन करण्यात आले. मात्र सदर शीतकेंद्र सुद्धा औटघटकेचेच ठरले. जिल्ह्यात केवळ ७ ते ८ सहकारी संस्था सुरू असून त्यांच्याकडील दुध खरेदी करून नागभिड येथील शीतकरण केंद्रात पाठविले जाते. गडचिरोली जिल्ह्याच्या दुधाची गरज खासगी कंपन्यांकडून भागवावी लागत आहे. खासगी कंपन्या अव्वाच्या सव्वा किंमतीत दुधाची विक्री करीत आहेत. कधीकधी दुधाचा दर्जाही सुमार राहतो. मात्र नाईलाजास्तव ग्राहकांना दुध खरेदी करावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल, यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून मागील काही दिवसांपासून केली जात आहे.