शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

देवदातील गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 6:00 AM

रेगडी जलाशय दिना नदीवर बांधण्यात आले आहे. सदर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर याचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे ओव्हरफ्लो सुरू असताना दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढते. देवदावरून रेगडीला जाण्यासाठी दिना नदी ओलांडून जावे लागते.

ठळक मुद्देदिना नदीवर पूलच नाही : एटापल्लीतील अनेक गावकरी करतात या मार्गाचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशयाजवळ असलेल्या देवदा येथील नागरिकांना रेगडी व पुढचा प्रवास दिना नदीतून करावा लागतो. मात्र या ठिकाणी पूल नसल्याने नागरिक जीव धोक्यात घालून नदीतील पाण्यातून प्रवास करतात.रेगडी जलाशय दिना नदीवर बांधण्यात आले आहे. सदर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर याचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे ओव्हरफ्लो सुरू असताना दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढते. देवदावरून रेगडीला जाण्यासाठी दिना नदी ओलांडून जावे लागते. एटापल्लीसह परिसरातील अनेक नागरिक सरळ रस्ता म्हणून देवदा मार्गे रेगडी, घोट, चामोर्शीला येतात. त्यामुळे या मार्गावरून कर्मचारी व इतर दुचाकीस्वारांची नेहमीच वर्दळ राहते. काही दुचाकीस्वार नदीतून पाणी वाहत असतानाही वाहन टाकतात. स्थानिक गावकरी १०० रुपये घेऊन दुचाकी वाहन काठ्यांच्या सहाय्याने उचलून दुसºया बाजूला नेऊन देतात. काही नागरिक नदीतून पाणी असतानाही पायदळ प्रवास करतात.सदर मार्ग अतिशय महत्त्वाचा असल्याने नदीवर पूल बांधावे, अशी मागणी देवदासह परिसरातील अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. उन्हाळा व हिवाळ्यात या नदीत पाणी राहत नाही. मात्र पावसाळ्यात पाणी राहत असल्याने प्रवास धोकादायक आहे.रेगडी जलाशयाने वाढते पाणीपातळीरेगडी जलाशयाचे ओव्हरफ्लोचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे पावसाळ्यात या नदीतून पाण्याचा प्रवाह अधिक राहतो. तरीही अनेक नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :riverनदीfloodपूर