शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

आदिवासीबहुल जिल्ह्यातील बिंदू नामावलीत होणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:36 PM

शासनाने अलिकडेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षण लक्षात घेऊन आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यांमधील प्रशासकीय पदांच्या बिंदू नामावलीत बदल केला जाणार आहे.

ठळक मुद्देशासन निर्णय : गट ‘क’ व ‘ड’ ची भरती

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : शासनाने अलिकडेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षण लक्षात घेऊन आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यांमधील प्रशासकीय पदांच्या बिंदू नामावलीत बदल केला जाणार आहे. याबाबतचा निर्णय शासनाने १६ ऑगस्ट रोजी घेतला आहे.राज्यात नाशिक, धुळे, नंदूरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली हे आदिवासीबहुल जिल्हे आहेत. आदिवासींना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या उद्देशाने शासनाने वेळोवेळी शासन निर्णय काढून या जिल्ह्यातील अनुसूचित जमातींचे (आदिवासी) आरक्षण वाढविले आहे. सद्य:स्थितीत पालघर, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २२ टक्के, रायगड जिल्ह्यात ९ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात १५ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात १४ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात २४ टक्के आरक्षण अनुसूचित जमातींसाठी देण्यात आले आहे. शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी १६ टक्के आरक्षण लागू केले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांच्या बिंदू नामावलीत बदल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने एसईबीसींचे आरक्षण १६ टक्केवरून १३ टक्के केले आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये गट ‘क’ व गट ‘ड’ च्या पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एसईबीसीचे आरक्षण १६ टक्केवरून १३ टक्के करून नव्याने बिंदू नामावली तयार केली जाईल. त्यानुसारच पदभरती होणार आहे. याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

टॅग्स :Governmentसरकार