शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याने नदीकाठाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:58 IST

सती नदीवर चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी नदीचे काठ नदीपात्रात कोसळत आहे.

ठळक मुद्दे४० लाखांचा खर्च पाण्यात : १० वर्षांपूर्वी चुकीच्या पद्धतीने झाले होते बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सती नदीवर चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी नदीचे काठ नदीपात्रात कोसळत आहे.नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी शिवकालीन बंधारे बांधले जात होते. हा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रात यशस्वी झाला. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील काही नदी, नाल्यांवर शिवकालीन बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर बंधारे प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात आले होते. मात्र ते चुकीच्या पद्धतीने बांधल्या गेल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. सदर बंधारे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने या बंधाºयामुळे एक दिवस नदीचे संपूर्ण काठच सपाट होण्याची भीती आहे.कुरखेडा तालुक्यातील कढोली गावातून वाहणाºया सती नदीच्या पात्रात सन २००८-०९ या वर्षांत ४० लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधल्याने पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने बंधारा फुटला. शिवकालीन बंधारा हा जमिनीच्या भूगर्भात बांधला जातो, पण हा पंधारा नदी पात्राच्या तीन फूट उंच बांधण्यात आला. शिवकालीन बंधाºयाची सिमेंट भिंत नदीपात्राच्या समांतर असते. मात्र सती नदीवरचा बंधारा तीन फूट उंच बांधण्यात आला. बंधारा तर पहिल्याच वर्षी वाहून गेला. मात्र त्याचे अवशेष अजूनही नदीपात्रात आहेत.नदीचे पाणी बंधाऱ्याच्या या अवशेषांना आपटते व परत नदीकाठावर येते. त्यामुळे नदीकाठ खचत आहे. मागील १० वर्षांत बंधाºयापासून काही दूर अंतरावरील नदीकाठ खचले आहे. जवळपास आठ ते दहा एकर जमिनीचे नुकसान झाले आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. या योजनेवर झालेला ४० लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे.बंधारा नष्ट कराबंधारा नष्ट झाला असला तरी या बंधाऱ्याचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. या अवशेषांना नदीचे पाणी आदळून ते नदीकाठालाही आदळते. सतत जवळपास चार महिने नदीकाठाला पाणी आदळत असल्याने नदीकाठ खचत चालला आहे. आठ ते दहा एकरातील शेती नष्ट झाली आहे. भविष्यात पुन्हा शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधाºयाचे अवशेष नष्ट करावे, अशी मागणी आहे.