शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

अटलजींच्या जाहीर सभेने गाठला होता गर्दीचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:42 PM

ओजस्वी वक्ते, संवेदशील कवी आणि अजातशत्रू नेता म्हणून देशावर आपली छाप पाडणारे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ भाजप नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने गडचिरोलीवासीयांच्या ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या.

ठळक मुद्देदोन वेळा गडचिरोलीत सभा : पक्षनिधी म्हणून कार्यकर्त्यांनी दिली होती ३० हजार रुपयांची थैली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ओजस्वी वक्ते, संवेदशील कवी आणि अजातशत्रू नेता म्हणून देशावर आपली छाप पाडणारे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ भाजप नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने गडचिरोलीवासीयांच्या ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. राजकीय कारकिर्दीत दोन वेळा गडचिरोलीत जाहीर सभा घेणाऱ्या अटलजींची दुसरी सभा तर गडचिरोलीचा अनेक वर्षातील गर्दीचा उच्चांक गाठणारी ठरली. गुरूवारी सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.अटलजींची गडचिरोलीतील पहिली सभा १९८५ च्या सुमारास झाली होती. त्यावेळी ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. इंदिरा गांधी चौकातील श्याम टॉकीजच्या बाजुला असलेल्या खुल्या जागेवर ती जाहीर सभा झाली होती. त्यावेळी पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांच्या वतीने जमा करण्यात आलेल्या ३० हजार रुपयांच्या निधीची थैली आणि तलवार त्यांना भेट देण्यात आली होती.दुसरी जाहीर सभा १९९६ मध्ये झाली. ही सभा वसंत विद्यालयाच्या पाठीमागच्या मैदानावर झाली होती. त्यावेळी राज्यात जेमतेम भाजप-सेनेचे युती सरकार सत्तेवर आले होते. महाराष्ट्राप्रमाणे केंद्रातही भाजपचा झेंडा फडकवण्याचा संकल्प करीत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी झंझावती दौऱ्यावर निघाले होते. आज गडचिरोलीवासियांसाठी हेलिकॉप्टरचे दर्शन रोजचेच झाले असले तरी त्यावेळी अटलजींचे हेलिकॉप्टर शहरवासियांचे अप्रुप होते. राज्य मंत्रीमंडळातील तत्कालीन मंत्री नितीन गडकरी, शोभाताई फडणवीस यांच्यासह अ‍ॅड.दादाजी देशकर, लोकसभेचे उमेदवार विलास कोडाप, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत जंबेवार, बाबुराव कोहळे आदी मंचावर विराजमान होते.विरोधी पक्षनेते म्हणून लोकसभेत आपली छाप पाडणाºया अटलजींना ऐकण्यासाठी त्यावेळी गडचिरोली शहरासह जिल्हाभरातून लोक जमले होते. समर्थ यांच्या घरापासून तर आताच्या महिला रुग्णालयापर्यंत लोक सभेत बसले होते. त्यावेळी त्या भागात आतासारखी दुकाने, वॉल कंपाऊंड काहीही नव्हते. त्यामुळे धानोरा मार्गापर्यंत सर्व भाग मोकळा होता. त्या सभेत जिल्हा भाजपच्या वतीने अटलजींना ५ लाख रुपयांची थैली पक्षकार्यासाठी भेट देण्यात आली होती. त्या निवडणुकीनंतरच अटलजी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यानंतरही त्यांनी गडचिरोलीशी ऋणानुबंध कायम ठेवले.कवितेची दखल१९९६ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अटलजी पंतप्रधान झाले. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी त्यांनी श्रीनगर ते लाहोर ही बस सुरू केली होती. त्यावर आधारित ‘शांती का संदेश’ ही कविता भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत जंबेवार यांचे वडील आणि व्यवसायाने शिक्षक तथा कवी असलेले मधुकर जंबेवार यांनी आपल्या ‘मधुरांगन’ या हिंदी कवितासंग्रहात प्रकाशित केली होती. त्याची प्रत अटलजींना पाठविल्यानंतर त्यांनी आपल्या खासगी सचिवामार्फत जंबेवार यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानून आपल्यातील सहृदयी व्यक्तिमत्त्वाचा परिचय दिला.कार्यकर्त्यांची प्रार्थनाअटलजींची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी गडचिरोली शहरालगतच्या सेमाना देवस्थान येथे प्रार्थना केली. यावेळी भारत खटी, दामोदर अरगेला, अनिल पोहनकर, प्रकाश अर्जुनवार, नंदू काबरा, अनिल कुनघाडकर, अविनाश महाजन, आनंद श्रृंगारपवार, विनोद देवोजवार, अंकित हेमके, डेडुजी राऊत आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा