शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नववी उत्तीर्ण व दहावीचे आवेदनपत्र न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST

निवेदनात म्हटले की, शासन निर्णय २८ मे २०२१च्या अनुषंगाने इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी आवेदन केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना ...

निवेदनात म्हटले की, शासन निर्णय २८ मे २०२१च्या अनुषंगाने इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी आवेदन केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना इयत्ता ९ वीचे ५० टक्के गुण व १० वीचे अंतर्गत व इतर मिळून ५० टक्के गुण ग्राह्य धरून मूल्यांकनाची पद्धत ठरलेली आहे. त्यानुसार २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र बोर्ड, सीबीएससी बोर्ड व इतर बोर्डाच्या इयत्ता १० वी परीक्षार्थ्यांची संख्या ही अंदाजे १७ लाखांच्या जवळपास आहे. २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र बोर्ड पॉलिटेक्निक व आयटीआयमध्ये प्रवेश क्षमता ही २२ लाख होती. वरील संख्येचा विचार केल्यास अकरावी प्रवेशीत विद्यार्थी संख्या ही अंदाजे परीक्षार्थ्यांची संख्या यामध्ये ५ लाखांचा फरक आहे. याचाच अर्थ उपलब्ध विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागांची संख्या जास्त आहे.

चालू सत्रात इयत्ता ११ वीच्या बहुसंख्य तुकड्या, तसेच काही शाळा बंद होऊ शकतात. जे विद्यार्थी ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकल्यामुळे दुरावले व इतर तांत्रिक अडचणींमुळे आवेदन भरू शकले नाहीत; परंतु ९ वीची परीक्षा उत्तीर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा चालू शैक्षणिक वर्षात अकरावीत प्रवेश दिल्यास सोयीचे होऊ शकते. यासाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.