शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८८ हातपंप बंद

By admin | Updated: March 6, 2017 00:37 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी देखभाल दुरूस्ती संदर्भात करारनामे केलेल्या हातपंपाची एकूण संख्या ७ हजार ३७२ आहेत.

उन्हाळ्यात पाणी टंचाईचे सावट : सर्वाधिक एटापल्ली तालुक्यातील हातपंप नादुरूस्तगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी देखभाल दुरूस्ती संदर्भात करारनामे केलेल्या हातपंपाची एकूण संख्या ७ हजार ३७२ आहेत. यापैकी सद्य:स्थितीत तब्बल ८८ हातपंप बंद आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हातपंप दुरूस्तीच्या कामात पंचायत समितीस्तरावरून दिरंगाई होत असल्याचा आरोप गावातील नागरिकांकडून केला जात आहे.मुलचेरा तालुक्यासह एकुण १२ तालुक्यात ग्रामपंचायती अंतर्गत एकूण ९ हजार १ हातपंप आहेत. यापैकी ७ हजार ३७२ हातपंपाच्या देखभाल व दुरूस्ती संदर्भात संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीशी करारनामे केले आहेत. करारनामे करण्यात आलेल्या हातपंपामध्ये गडचिरोली तालुक्यातील ९१८, आरमोरी ६१८, कुरखेडा ७५३, धानोरा ८०१, चामोर्शी ८८४, अहेरी ७९१, एटापल्ली ७०८, सिरोंचा ६५६, कोरची ५१४, देसाईगंज ३३१ व भामरागड तालुक्यातील ३९८ हातपंपाचा समावेश आहे. सद्य:स्थितीत बंद असलेल्या हातपंपामध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, आरमोरी ४, कुरखेडा ३, धानोरा ८, चामोर्शी ८, अहेरी ४, सिरोंचा १५, कोरची १, भामरागड ४ व एटापल्ली तालुक्यातील सर्वाधिक ३१ हातपंपाचा समावेश आहे.सदर ८८ हातपंप बंद असल्याने संबंधित गावातील व परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मागील महिन्यात जिल्हाभरातील एकूण ४३७ हातपंप बंद पडले होते. त्यापैकी ३४९ हातपंपाची दुरूस्ती करण्यात आली. अद्यापही ८८ हातपंप बंद आहेत. पंचायत समिती प्रशासनाकडे मनुष्यबळाचा अभाव व हातपंप देखभाल दुरूस्तीच्या वाहनाची संख्या कमी आहे. धानोरा तालुक्यात हातपंप दुरूस्तीसाठी पंचायत समितीकडे एकच वाहन उपलब्ध आहे. परिणामी तालुक्याच्या परिसर व गावातील संख्येचा आवाका लक्षात घेता तालुक्यात लवकर वाहन पोहोचत नाही. (नगर प्रतिनिधी)खंडित वीज पुरवठ्याने अनेक नळ पाणी योजना बंदग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने तालुका मुख्यालय व मोठ्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र काही गावातील पाणी योजनेचे लाखो रूपयांचे वीज बिल थकल्यामुळे महावितरणने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून २५ वर नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याच्या काही गावातील जलशुध्दीकरण प्रकल्पही बंद पडले आहेत. काही गावातील सौरउर्जेवरील पाणी योजना नादुरूस्त आहेत.