शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांत जिल्ह्यात आदिवासींच्या ३४१ तर दलितांच्या २२ हत्या

By admin | Updated: July 11, 2015 02:29 IST

पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार १९९० पासून आतापर्यंत १५ वर्षांच्या कालावधीत नक्षल्यांकडून गडचिरोली जिल्ह्यातील ३४१...

सुनील खोब्रागडे यांचा आरोप : दलित व आदिवासी नक्षल्यांच्या टार्गेटवर
गडचिरोली : पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार १९९० पासून आतापर्यंत १५ वर्षांच्या कालावधीत नक्षल्यांकडून गडचिरोली जिल्ह्यातील ३४१ आदिवासी नागरिकांच्या तर २२ दलित नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. जातीद्वेष भावनेतून नक्षल्यांकडून आदिवासी व दलितांच्या मोठ्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप स्वारीप युथ रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष तथा एका वृत्तपत्राचे संपादक सुनील खोब्रागडे यांनी बुधवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बोलताना सुनील खोब्रागडे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात दलित, आदिवासी व इतर दुर्बल घटकातील नागरिकांच्या अत्याचाऱ्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर असून अहमदनगर जिल्हा अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. नक्षल चळवळीतील वरिष्ठ जातीच्या नेत्यांनी जातीय दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांत दलित व आदिवासी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हत्या केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १५ वर्षांत ओबीसी प्रवर्गातील नऊ नागरिकांच्या हत्या झाल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे, असेही खोब्रागडे म्हणाले.
नक्षल्यांकडून दलित व आदिवासी नागरिकांच्या झालेल्या हत्या संदर्भात संबंधित आरोपींवर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास केला जातो. मात्र जातीय द्वेषभावनेतून आदिवासी व दलितांच्या हत्या झाल्या आहेत. या हत्यांच्या गुन्ह्याचा तपास पोलीस विभागाने जातीयदृष्टिकोनातून करावा, नक्षल्यांकडून आदिवासी व दलितांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी भादंविच्या विविध कलमासोबतच अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, तसेच या हत्या जातीय हत्या म्हणून घोषित करण्यात याव्या, अशी मागणी खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना आपण दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील रहिवासी पत्रू दुर्गे याची २०१५ च्या मे महिन्यात नक्षल्यांनी जातीय द्वेषभावनेतून हत्या केली, असा आरोप खोब्रागडे यांनी केला. ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर दामरंचाचे सरपंचपद अनुसूचित जातीकरिता राखीव करण्यात आले. त्यानंतर काही दिवसात नक्षल्यांनी पत्रू दुर्गे याची हत्या केली, असे स्वारिप युथ रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खोब्रागडे यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)