शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

३४ टक्केच कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:58 IST

जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते.

ठळक मुद्देखरिपातील पीक कर्जाची स्थिती : धान रोवणीचे काम संपले, कर्जाची मागणी मंदावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १८ हजार ८८४ शेतकºयांना ७५ कोटी ६९ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण झाले आहे.कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये, यासाठी राष्टÑीयकृत बँकांना शेतकºयांना पीक कर्जाचे वितरण करणे बंधनकारक केले आहे. दरवर्षी खरीप हंगामाच्या पूर्वी संबंधित बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. किमान उद्दिष्टाएवढे किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात कर्ज वितरण करणे अपेक्षित असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता राष्टÑीयकृत बँका कर्जाचे वितरण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बँकांना दिलेले उद्दिष्ट कधीच पूर्ण होत नाही. काही बँकातर एकाही शेतकºयाला कर्ज देत नसल्याची परिस्थिती आहे. अशा बँकांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी होत असली तरी कोणतीही कारवाई होत नसल्याने बँकेचे प्रशासन सरकारलाही जुमानत नसल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर धान पिकाचे खरीपात उत्पादन घेतले जाते. धान हे येथील प्रमुख व महत्त्वाचे पीक आहे. या पºहे टाकण्यापासून तर धानाची रोवणी, निंदन, कापणी, मळणी, यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. बँकांकडून घेतलेले कर्ज बिनव्याजी राहत असल्याने ते कर्ज शेतकºयांना परवडणारेही आहे. या कर्जावरील व्याज शासन बँकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे कृषी कर्जांमध्ये बँकांचा कोणताही तोटा नाही. मात्र बँकेचे प्रशासन शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने कर्ज वितरणाचे उद्दिष्ट कोणत्याच वर्षी गाठता येत नसल्याचे दिसून येते. बँकांना वेळोवेळी निर्देश दिल्यानंतरही बँका कर्ज वितरणास तयार होत नाही. ही अतिशय गंभीर बाब असल्याने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.कर्जमाफीचा परिणामकर्जमाफी होणार आहे याचा अंदाज शेतकºयांना जवळपास मार्च महिन्यापासून येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कर्जच भरले नाही. दरवर्षी नियमितपणे कर्ज भरणाºया शेतकºयांनी कर्जमाफीच्या अंदाजामुळे मागील वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी त्यांना नवीन कर्ज उचलता आले नाही. ३१ जुलैपर्यंत मागील वर्षी सुमारे २२ हजार ९६७ शेतकºयांना कर्जाचे वितरण केले होते. तर यावर्षी केवळ १६ हजार ९०३ शेतकºयांना कर्ज वितरण झाले आहे. दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिलेल्या उद्दिष्टाच्या अधिक कर्ज वितरण सदर बँक करते. यावर्षी मात्र १५ आॅगस्टपर्यंत केवळ ७१ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. धानाच्या शेतीत सर्वाधिक खर्च रोवणीसाठी येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी रोवण्याच्या पूर्वीच कर्जाचे उचल करतात. आता रोवणीची कामे संपली आहेत. त्यामुळे कर्जाची उचल होण्याची फार कमी शक्यता आहे.रोवणीची कामे आटोपलीरोवणीच्या कामासाठी सर्वाधिक खर्च येत असल्याने शेतकरी रोवणीपूर्वीच कर्ज घेतो. रोवणीची कामे आता आटोपली आहे. त्यामुळे कर्जाची मागणी मंदावणार आहे.