शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

अंगारातील २७ वीज खांब जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 6:00 AM

४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देदुर्घटनेची शक्यता : ४० वर्षांपूर्वी गावात लावले होते खांब; गावकऱ्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : ४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चांगदेव फाये, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी गावातील वीज खांबांची तपासणी केली असता, सुमारे २७ वीज खांब जीर्ण झाले असल्याचे दिसून आले आहे. सदर वीज खांब खालच्या बाजूस गंजले आहेत. खांबाच्या मधला भाग गंजून नष्ट झाला आहे. केवळ दोन बाजू शिल्लक असून त्यावर खांब उभा आहे. सदर खांब गावात आहे. वादळवाºयामुळे यातील काही खांब कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीर्ण झालेले वीज खांब बदलवावे, यासाठी गावकरी व ग्रामपंचायतींनी महावितरणला अनेकवेळा निवेदन सादर केले. मात्र जीर्ण खांब बदलविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.अंगारा हे कुरखेडा तालुक्यातील मोठे गाव आहे. या गावात जवळपास १ हजार कुटुंब आहेत. प्रत्येक घरी वीज जोडणी आहे. विद्युत बिलाच्या माध्यमातून महावितरणला महिन्याचा लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होते. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी चांगदेव फाये यांच्यासह भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, डॉ.मनोहर आत्राम, सुलक्षण नंदनवार, देवदत्त हाडगे, दादाजी सुकारे, देवराव उईके, दिगांबर बाळबुद्धे, किसन लांजेवार, भजन कापगते, भूपेंद्र गहाणे, महिपाल कुमरे यांच्यासह अंगारातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :electricityवीज